Mumbai Goa highway : आक्रमक राणे पॅटर्नमुळेच सिंधुदुर्गातील महामार्ग पूर्ण झाला

नितेश राणे यांच्या आंदोलनाचं महत्त्व कोकणवासीयांना समजलं


खरा विकास आणि भावनिक खोटं राजकारण जनताच ठरवेल


सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa highway) पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महामार्गावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र जुलै २०१९ मध्येच या गोष्टीची दखल घेतली. त्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाचे महत्त्व कोकणवासीयांना आता कळले आहे. त्यामुळे त्यावेळेस या आंदोलनाला विरोध केलेल्या विरोधकांना चांगलीच अदद्ल घडली आहे.


मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण होत नसल्याने २०१९ मध्ये नितेश राणे यांनी संबंधित अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. या गोष्टीला तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी नितेश राणेंची गुंडगिरी संबोधून विरोध केला व कारवाईची मागणी केली. रत्नागिरी-रायगडची (Ratnagiri Raigad) जनता ह्याच शिवसेना नेत्यांना पाठिंबा देत होती. त्यामुळे नितेश राणेंना आठ दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र, काहीतरी मिळवण्यासाठी त्यागही करावाच लागतो, या उक्तीप्रमाणे नितेश राणे या गोष्टीलाही सामोरे गेले.



अखेर, राजकारणात आपली स्वतःची एक वेगळी स्टाईल निर्माण केलेल्या राणे परिवारातील नितेश राणे यांच्या आंदोलनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलदगतीने संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरण होऊन दीड वर्षापूर्वीच चौपदरीकरण पूर्ण झाले. शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाठिंबा देणाऱ्या रत्नागिरी-रायगडची इच्छाशक्ती मात्र कमी पडली. चिपळूणचा वाळूचोर भास्कर जाधव हायवे ठेकेदारांच्या पैशांवर मुलाचे थाटामाटात लग्न करत होता पण त्याला जनता दिसत नव्हती. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम पूर्ण झालं मात्र रायगड-रत्नागिरीमध्ये ते होऊ शकलं नाही.


मुंबई-गोवा महामार्गावर सध्या असलेल्या खड्ड्यामुळे लोक आक्रमक झाले आहेत तेव्हा आता बाकीच्या पक्षातील लोकांना दुरुस्तीबद्दल सुचू लागलं आहे. पण त्यामुळे केवळ निवडणूक जवळ आल्यानेच या महामार्गाचं राजकारण केलं जात आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे. त्यावेळेस नितेश राणेंच्या विरोधात उभे राहिलेल्यांना देखील आता या आंदोलनाचं महत्त्व कळू लागलं आहे. जे बाकी पक्षांना आता कळतंय ते नितेश राणेंना चार वर्षांपूर्वीच कळलं होतं. शेवटी खरा विकास कोण करु शकतं आणि भावनिक खोटं राजकारण कोण करतं हे जनताच ठरवेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments

चंद्रकांत साळुंके,मलकापूर जि बुलडाणा    August 19, 2023 12:12 PM

खूपच छान,मा.नितेश राणेसाहेब यांचे आक्रमकपणातून त्या कामाविषयी असलेली तळमळ लक्षात येते.अभिनंदन

Add Comment

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला