Loyalty : निष्ठेचा परिणाम फार...


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले, तर आम्हाला केव्हाही दु:ख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा-बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. ती दोघे आपसांत बोलत होती की, “आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको. तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ.” त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, “तुम्ही का घाबरता? आम्ही बरोबर आहोत ना! आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो, आहो तेव्हा आपण जाऊ या.” या नवरा-बायकोला ती माणसे वाईट आहेत, असे वाटले नाही.


पुढे एका दरीत गेल्यावर, त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, “रामा! मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस!” एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले, त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरी पोहोचवले.


घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, “तसे जाऊ नका, थोडे गूळपाणी घेऊन जा.” ते म्हणाले, “नको, आम्हाला फार कामे आहेत.” ती म्हणाली, “थांबा जरा, मी आत्ता आणतेच.” म्हणून ती आत वळली, तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील; परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले.


सगुणभक्तीचा जर काही मोठा फायदा असेल, तर तो हा की, जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो, तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावे, “रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन, पण तू माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलो आहे.” आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धिमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील, त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल, लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

संसारी असावे सावध

जीवन संगीत,सद्गुरू वामनराव पै सर्ग, नियम व आपले कर्म यांचा आपल्या जीवनातील घडामोडींशी, आपण भोगणाऱ्या सुख

नरदेहाचे महत्त्व

परमेश्वराने सारासारविवेकसंपन्न, सर्वोत्कृष्ट, दुर्लभ असा जो नरदेह दिला त्यात, प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे

शंभरी ऋतुराजाची

ऋतुराज,ऋतुजा केळकर मी एक ‘साधी स्त्री’ जीवनाच्या आकडेमोडीत हरवलेली. संसार, लग्न, मुलं या साऱ्या घटना जशा एका

माणूस आणि मन

मर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक हे खूप प्रसिद्ध आहेत. मनाचे श्लोक माहीत नाहीत असा माणूस निराळाच. त्यांच्या

महर्षी याज्ञवल्क्य

कदा जनकराजाने आपल्या दरबारात शास्त्रचर्चेसाठी विद्वानांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्याने घोषणा केली की

सुप्रभात

बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥ झाडू संतांचे मारग। आडराने भरले जग ॥ उच्छेदाचा भाग । शेष ठरला तो सेवू ।| अर्थ