BCCI: जय शहा आणि राहुल द्रविड यांची बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा

  122

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे अध्यक्ष असलेल्या जय शहा यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मियामीमध्ये अचानक भेट घेतली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघ मियामी मधील एका हॉटेलमध्ये थांबला असतानाच वैयक्तिक कामाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या जय शहा यांनी राहुल द्रविड यांना अचानकपणे भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाल्याची वार्ता यातून पुढे आली आहे. ज्यामध्ये, येत्या काळात क्रिकेटच्या विश्वातील दोन महत्त्वपूर्ण सामने असलेल्या आशिया चषक आणि विश्वचषक या सामन्यांबद्दल संघाची भूमिका आणि एकंदरच त्यासाठीची रणनीती यावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गेल्या काही वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची आयसीसीसीमधील निराशाजनक कामगिरी आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेतील अपयश पाहता भारतीय क्रिकेट संघावर चहूबाजूंनी टीका होत असतानाच, जय शहा आणि राहुल द्रविड यांच्यातील भेटीमुळे सध्या क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी