Ajay Rai: मोदींविरोधात निवडणूक लढवणारे अजय राय यूपी काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी (loksabha election) उत्तर प्रदेशात (uttar pradesh) आता काँग्रेस (congress) अॅक्टिव्ह दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार अजय राय(ajay rai) उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या(up congress committee) अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. काँग्रेस नेते अजय राय यांनी दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढवली आहे. पहिल्यांदा २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये यांनी निवडणूक लढवली होती.


अजय रायने यूपी काँग्रेसमध्ये बृजलाल खाबरी यांची जागा घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ८० जागा असलेला उत्तर प्रदेश देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र सातत्याने निवडणूक हरणाऱ्या काँग्रेसची स्थिती या ठिकाणी खूप खराब आहे. २०१९मधील निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपली परंपरागत आणि सगळ्यात सुरक्षित मानली जाणारी अमेठीची जागाही गमावली होती. अशातच विखुरलेल्या संघटनेला एकत्र करणे आणि लोकसभा निवडणुकीआधी पार्टी कॅडर तयार करणे हे अजय राय यांच्याशी आव्हान असणार आहे.


२०१९च्या लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये काँग्रेसला केवळ रायबरेली या जागेवर विजय मिळाला होता. सोनिया गांधी येथे खासदार आहेत. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या.



कोण आहेत अजय राय


१९ ऑक्टोबर १९६९ला वाराणसीत जन्मलेले अजय राय पाच वेळा आमदार राहिले आहेत. १९९६मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते २००७मपर्यंत आमदार राहिले. यानंतर भाजमपधील मतभेदानंतर त्यांनी समाजवादी पक्ष जॉईन केला होता. २००९मध्ये त्यांनी मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि ते हरले होते. त्यानतंर त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात धरला. अजय राय यांच्याबाबत असे बोलले जाते की ते आपल्या जोरावर निवडणूक जिंकतात आणि पक्षाला याचा फायदा होतो. मात्र गेल्या काही निवडणुकीत त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला.

Comments
Add Comment

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर