India China: भारत-चीन यांच्यात कमांडर स्तरावर बैठक, या मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली: भारत (india) आणि चीन (china) यांच्यातील सैन्यामध्ये झालेल्या १९व्या फेरीतील चर्चेनंतर कोणतेही ठोस यश मिळाले नाही. दोन्ही देशांच्या सैन्यांनी १३-१४ ऑगस्टला एलएसीजवळ भारतीय क्षेत्रात चुशुल-मोल्डोमध्ये कोर कमांडर स्तरावरील १९व्या फेरीतील चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानुसार दोन्ही पक्षांनी पश्चिम क्षेत्रात एलएसीवर इतर मुद्द्यांवर सकारात्मक, रचनात्मक आणि गहन चर्चा केली. ही चर्चा सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाली आणि तब्बल १० तास सुरू होती.


परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार बैठकीदरम्यान चीन इतर मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यास सहमत झाला. शेजारील देश आणि राजनायिक चॅनेल्सच्या माध्यमातून बातचीत कायम ठेवण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली. दोन्ही देशांनी सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता कायम ठेवण्यास सहमती दाखवली.


याआधी सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले होते की दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सैनिकांच्या पुनरागमनाबाबतच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. भारताने बैठकीत देपसांग आणि डेमचोकसह इतर ठिकाणी सैन्याचे पुनरागमन करण्याबाबत दबाव टाकला. सोबतच या बैठकीत तणाव कमी करण्याबाबतही चर्चा झाली.



याआधी एप्रिलमध्ये झाली होती १८वी फेरी


याआधी एप्रिल महिन्यात पूर्व लडाख येथे भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची १८वी फेरी पार पडली होती. या बैठकीचे नेतृत्व भारताचे लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले होते. दुसरीकडे तितक्याच दर्जाच्या चीनच्या अधिकाऱ्याने त्यांची बाजू मांडली होती.


२०२० मध्ये गलवान येथे भारतीय सैन्य तसेच चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ