India China: भारत-चीन यांच्यात कमांडर स्तरावर बैठक, या मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली: भारत (india) आणि चीन (china) यांच्यातील सैन्यामध्ये झालेल्या १९व्या फेरीतील चर्चेनंतर कोणतेही ठोस यश मिळाले नाही. दोन्ही देशांच्या सैन्यांनी १३-१४ ऑगस्टला एलएसीजवळ भारतीय क्षेत्रात चुशुल-मोल्डोमध्ये कोर कमांडर स्तरावरील १९व्या फेरीतील चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानुसार दोन्ही पक्षांनी पश्चिम क्षेत्रात एलएसीवर इतर मुद्द्यांवर सकारात्मक, रचनात्मक आणि गहन चर्चा केली. ही चर्चा सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाली आणि तब्बल १० तास सुरू होती.


परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार बैठकीदरम्यान चीन इतर मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यास सहमत झाला. शेजारील देश आणि राजनायिक चॅनेल्सच्या माध्यमातून बातचीत कायम ठेवण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली. दोन्ही देशांनी सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता कायम ठेवण्यास सहमती दाखवली.


याआधी सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले होते की दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सैनिकांच्या पुनरागमनाबाबतच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. भारताने बैठकीत देपसांग आणि डेमचोकसह इतर ठिकाणी सैन्याचे पुनरागमन करण्याबाबत दबाव टाकला. सोबतच या बैठकीत तणाव कमी करण्याबाबतही चर्चा झाली.



याआधी एप्रिलमध्ये झाली होती १८वी फेरी


याआधी एप्रिल महिन्यात पूर्व लडाख येथे भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची १८वी फेरी पार पडली होती. या बैठकीचे नेतृत्व भारताचे लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले होते. दुसरीकडे तितक्याच दर्जाच्या चीनच्या अधिकाऱ्याने त्यांची बाजू मांडली होती.


२०२० मध्ये गलवान येथे भारतीय सैन्य तसेच चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला