World Cup 2023: टीम इंडियातून ७ खेळाडूंचा पत्ता कट, गेल्यावेळेस वर्ल्डकपमध्ये मिळाली होती संधी

मुंबई: टीम इंडियासाठी(team india) आपल्या भूमीवर होणारा वर्ल्डकप (world cup) अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने २०११ नंतर एकही खिताब जिंकलेला नाही. अशातच रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी अतिशय मेहनत घेत आहे. वर्ल्डकपआधी टीम इंडिया ३० ऑगस्टला आशिया कप खेळणार आहे. येथे भारतीय संघाला २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. याशिवाय श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्धही सामना रंगणार आहे. हे सर्व संघ वर्ल्डकपमध्ये खेळत आहेत.

वर्ल्डकपमध्ये खेळणार अधिकाधिक खेळाडूंना आशिया कपसाठी संघात जागा मिळू शकते. या स्पर्धेद्वारे टीम मॅनेजमेंटला त्यांना परखण्याची संधी मिळेल. गेल्या वनडे वर्ल्डकपबाबत बोलायचे झाल्यास ७ खेळाडूंचा टीम इंडियातून पत्ता कट झाला आहे. म्हणजेच हे खेळाडू पुन्हा दिसणार नाहीत. यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह ३ विकेटकीपरही आहेत. धोनीने निवृत्ती घेतली आहे तर ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दिनेश कार्तिक संघात स्थान बनवण्याच्या स्पर्धेत नाही. वर्ल्डकपचे सामने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहेत.

धवनने ठोकले होते शतक


शिखर धवन २०१९ वनडे वर्ल्डकपमधील २ सामन्यात खेळला होता. त्याने या सामन्यात एका शतकासह १२५ धावा केल्या होत्या. मात्र यानंतर तो अंगठा फ्रॅक्चर झाल्याने स्पर्धेबाहेर गेला. याशिवाय केदार जाधवने ५ डावांत ८०, विजय शंकरने ३ डावांत ५८ तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ६ सामन्यात १० विकेट घेतल्या होत्या. २०१९च्या वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीने ८ डावांत २७३, ऋषभ पंतने ४ डावांत ११६ तर दिनेश कार्तिकने २ डावांत १४ धावा केल्या होत्या.

रोहितची ५ शतके


रोहित शर्मा या वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून उतरणार आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात तो खेळण्यास उतरला होता. मात्र सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवास सामोरे जावे लागले होते. गेल्या वर्ल्डकपमध्ये रोहित ५ शतके ठोकली होती.
Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या