Mathura: मथुरेच्या बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना, ५ जणांचा मृत्यू

मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये मंगळवारी बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना घडली. येथील दुसायत मोहल्ल्यामध्ये तीन मजली जुनी इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने तब्ब १२ लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी पुलकित खरे यांनी पाच लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला.


दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले. जखमींच्या उपचारासाठी वृंदावनच्या सौ शैया रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पावसामुळे तीन मजल्याची इमारतीचा छज्जा कोसळला.





डीएम पुलकित खरे यांनी सांगितले की जुन्या इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर चार लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तसेच जे जखमी झाले त्यांना मदतकार्य दिले जाईल. दरम्यान, ही दुर्घटना का घडली याचा तपास केला जाईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस कोसळत आहे.





दुसरीकडे एसएसपी शैलेश पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसायत मोहल्लेकडे एक जुनी तीन मजली घर होते. मात्र अचानकपणे घरचा वरचा भाग कोसळला. यामुळे मलब्याखाली अनेक जण दबले गेले. पोलिसांच्या टीमसोबत फायर बिग्रेड टीमही बचावकार्यात व्यस्त आहे. दरम्यान, नगर विकास अधिकाऱ्यांच्या टीमलाही घटनास्थळी बोलावले आहे. जर इमारतीचा एखादा भाग जर कोसळलेला असेल तर या घराला पाडण्याचे काम केले जाईल. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला