Mathura: मथुरेच्या बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना, ५ जणांचा मृत्यू

मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये मंगळवारी बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना घडली. येथील दुसायत मोहल्ल्यामध्ये तीन मजली जुनी इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने तब्ब १२ लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी पुलकित खरे यांनी पाच लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला.


दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले. जखमींच्या उपचारासाठी वृंदावनच्या सौ शैया रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पावसामुळे तीन मजल्याची इमारतीचा छज्जा कोसळला.





डीएम पुलकित खरे यांनी सांगितले की जुन्या इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर चार लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तसेच जे जखमी झाले त्यांना मदतकार्य दिले जाईल. दरम्यान, ही दुर्घटना का घडली याचा तपास केला जाईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस कोसळत आहे.





दुसरीकडे एसएसपी शैलेश पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसायत मोहल्लेकडे एक जुनी तीन मजली घर होते. मात्र अचानकपणे घरचा वरचा भाग कोसळला. यामुळे मलब्याखाली अनेक जण दबले गेले. पोलिसांच्या टीमसोबत फायर बिग्रेड टीमही बचावकार्यात व्यस्त आहे. दरम्यान, नगर विकास अधिकाऱ्यांच्या टीमलाही घटनास्थळी बोलावले आहे. जर इमारतीचा एखादा भाग जर कोसळलेला असेल तर या घराला पाडण्याचे काम केले जाईल. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

Comments
Add Comment

करूर चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ४० वर, करूर दुर्घटनेतील ४० पैकी ३५ मृतदेहांची ओळख पटली; टीव्हीके पक्षाची उच्च न्यायालयात स्वतंत्र चौकशीची मागणी

चेन्नई : अभिनेता आणि तमिलगा वेट्री कळघम पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्या करूर येथील प्रचार सभेत झालेल्या भीषण

'मन की बात': मोदींचा स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह; महिला आणि परंपरांचा गौरव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १२६ व्या भागात

पंजाब सीमेवर दोन पाकिस्तानी ड्रोन बीएसएफकडून जप्त

पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर चंदीगड : सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात

मध्य रेल्वे प्रशासनाची मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर

रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या