मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये मंगळवारी बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना घडली. येथील दुसायत मोहल्ल्यामध्ये तीन मजली जुनी इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने तब्ब १२ लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी पुलकित खरे यांनी पाच लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले. जखमींच्या उपचारासाठी वृंदावनच्या सौ शैया रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पावसामुळे तीन मजल्याची इमारतीचा छज्जा कोसळला.
डीएम पुलकित खरे यांनी सांगितले की जुन्या इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर चार लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तसेच जे जखमी झाले त्यांना मदतकार्य दिले जाईल. दरम्यान, ही दुर्घटना का घडली याचा तपास केला जाईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस कोसळत आहे.
दुसरीकडे एसएसपी शैलेश पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसायत मोहल्लेकडे एक जुनी तीन मजली घर होते. मात्र अचानकपणे घरचा वरचा भाग कोसळला. यामुळे मलब्याखाली अनेक जण दबले गेले. पोलिसांच्या टीमसोबत फायर बिग्रेड टीमही बचावकार्यात व्यस्त आहे. दरम्यान, नगर विकास अधिकाऱ्यांच्या टीमलाही घटनास्थळी बोलावले आहे. जर इमारतीचा एखादा भाग जर कोसळलेला असेल तर या घराला पाडण्याचे काम केले जाईल. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…