Maharashtra Politics : थोडं थांबा, राष्ट्रवादी एकसंघ आहे की फाटाफूट लवकरच कळेल

गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट!


नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट सत्तारूढ सेना-भाजपा बरोबर आहे. तर काँग्रेस-ठाकरे गटासोबत शरद पवार (Sharad Pawar) आहेत. एकीकडे राष्ट्रवादीत फूट आहे अशी चर्चा असताना दुसरीकडे मात्र सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे हे संमतीचे राजकारण (Maharashtra Politics) सुरू आहे का, याबाबत संभ्रम आहे. त्यावर भाष्य करताना भाजपाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी थोडं थांबा, राष्ट्रवादी एकसंघ आहे की फाटाफूट लवकरच कळेल आणि हा संभ्रमही लवकरच दूर होईल, असे म्हटल्याने राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.


गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.


जयंत पाटील यांच्या भाजपाच्या पक्षप्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. अजितदादा पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे भाजपा बरोबर येतील असे वाटले होते का, असा उलट प्रश्न त्यांनी केला.


सध्या सत्तारूढ पक्षांमध्ये खाते वाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी कोणाला कोणतं खातं द्यायचं हे नेते ठरवतील आणि सर्व संमतीने यावर निर्णय होईल. यावरून सध्या सरकारमध्ये कोणतेही ताणतणाव नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.


ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना वेगवेगळे जिल्हे देण्यात आले. त्यामुळे पालकमंत्री पद बदलाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र महाजन यांनी पालकमंत्री पदाबाबत काहीच वाद नाही. छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत असेल तर गैर नाही, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात 'जावे विनोदाच्या गावा' विशेष

पिंजऱ्यातील बिबट्यांचे दात आता राहणार सुरक्षित! लोखंडी गजांना आता 'प्लास्टिक कोटिंग' करणार; वनमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडल्यानंतर पिंजऱ्यात त्यांना होणाऱ्या शारीरिक जखमा आणि त्यातून

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार

मुंबई : आरक्षणाच्या पेचामुळे २२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या वगळता राज्यातील उर्वरित

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व