Nawab Malik : 'नवाब मलिक आमचे'; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची चढाओढ

संख्याबळ वाढवण्यासाठी दोन्ही गटांची तयारी


मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची दीड वर्षांनंतर अखेर जामीनावर सुटका झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २ महिन्यांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांची सुटका होताच ते शरद पवार (Sharad Pawar) गटात जाणार की अजित पवारांना (Ajit Pawar) पाठिंबा देणार यावर चर्चा सुरु झाल्या. यानंतर आता दोन्ही गटही त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.


नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे (NCP) वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते ज्या गटाला पाठिंबा देतील त्या गटाला फायदाच होणार आहे. त्यासाठी दोन्ही गट सज्ज आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज नवाब मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर त्यांच्या सुटकेआधीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) स्वत: त्यांना भेटण्याची प्रतीक्षा करताना दिसल्या होत्या. अजित पवार गटाच्या भेटीवेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आणि मुंबई विभागीय समन्वय समिती सदस्य संतोष धुवाळी हे देखील उपस्थित होते.


याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नवाब मलिक हे अजित पवार यांनाच पाठिंबा देणार असल्याचे म्हणाले होते. सरळ सरळ त्यांनी तसा दावाच केला होता. तर नवाब मलिक हे शरद पवारांचे सच्चे कार्यकर्ते असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता नवाब मलिक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर