Narayan Rane : कोण विनायक राऊत? काय त्याची औकात?

  102

राऊतांच्या कोकणातल्या उपोषणावर नारायण राणे आक्रमक


नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपल्या आक्रमक शैलीसाठी सर्वांना परिचीत आहेत. त्यांनी आज अत्यंत आक्रमकतेने ठाकरे गटाचे (Thackeray gat) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. विनायक राऊत हे कोकणातील प्रश्नावर उपोषण करीत आहेत. याबाबत नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी राऊतांची औकातच काढली.

नारायण राणे म्हणाले की, कोण विनायक राऊत? काय औकात आहे त्यांची? गेल्या १० वर्षांत त्यांनी काही योजना आणली का? असा सवाल करत उपोषण काय करता त्यांना हवी असेल तर बिर्याणी पाठवतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.

शरद पवार (Sharad Pawar) कृषीमंत्री होणार का? याबाबत विचारले असता, तो माझा विषय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)त्यावर बोलतील, असे नारायण राणे यांनी सांगितले.

काँग्रेसचे काही आमदार भाजपकडे येणार


राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून काँग्रेस आणि ठाकरे गट भाजपविरोधात एकत्र येतील का? अशी विचारणा केली असता राणे म्हणाले की, दोन्ही पक्ष मिळून आणि ३६ जण एकत्र येऊन काही फायदा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिघे होते तरी ते काही करू शकले नाहीत. आता कमी जास्त झाले, तरी काही होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात काँग्रेसचे काही आमदार भाजपकडे येणार आहेत, त्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. भविष्यात काँग्रेस व ठाकरे गटाकडे फारसे आमदार राहणार नाहीत, असा दावाही नारायण राणे यांनी या वेळी बोलताना केला.

कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना


आज देशाचा स्वातंत्र्य दिन असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या प्रगतीबद्दल, सर्वांच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. त्यासोबतच कारागिरांच्या प्रगतीसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे, असेही राणे यांनी सांगितले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे