Narayan Rane : कोण विनायक राऊत? काय त्याची औकात?

राऊतांच्या कोकणातल्या उपोषणावर नारायण राणे आक्रमक


नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपल्या आक्रमक शैलीसाठी सर्वांना परिचीत आहेत. त्यांनी आज अत्यंत आक्रमकतेने ठाकरे गटाचे (Thackeray gat) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. विनायक राऊत हे कोकणातील प्रश्नावर उपोषण करीत आहेत. याबाबत नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी राऊतांची औकातच काढली.

नारायण राणे म्हणाले की, कोण विनायक राऊत? काय औकात आहे त्यांची? गेल्या १० वर्षांत त्यांनी काही योजना आणली का? असा सवाल करत उपोषण काय करता त्यांना हवी असेल तर बिर्याणी पाठवतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.

शरद पवार (Sharad Pawar) कृषीमंत्री होणार का? याबाबत विचारले असता, तो माझा विषय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)त्यावर बोलतील, असे नारायण राणे यांनी सांगितले.

काँग्रेसचे काही आमदार भाजपकडे येणार


राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून काँग्रेस आणि ठाकरे गट भाजपविरोधात एकत्र येतील का? अशी विचारणा केली असता राणे म्हणाले की, दोन्ही पक्ष मिळून आणि ३६ जण एकत्र येऊन काही फायदा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिघे होते तरी ते काही करू शकले नाहीत. आता कमी जास्त झाले, तरी काही होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात काँग्रेसचे काही आमदार भाजपकडे येणार आहेत, त्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. भविष्यात काँग्रेस व ठाकरे गटाकडे फारसे आमदार राहणार नाहीत, असा दावाही नारायण राणे यांनी या वेळी बोलताना केला.

कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना


आज देशाचा स्वातंत्र्य दिन असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या प्रगतीबद्दल, सर्वांच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. त्यासोबतच कारागिरांच्या प्रगतीसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे, असेही राणे यांनी सांगितले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने