Eknath Shinde in Irshalwadi : कार्यतत्पर मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी इर्शाळवाडीत दाखल

निवारा केंद्रांची केली पाहणी


पुढील सहा महिन्यांत पक्की घरे बांधून देणार


रायगड : आज स्वातंत्र्यदिनी (Independence day) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील भूस्खलन (Irshalwadi landslide) दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत दाखल झाले. या ठिकाणी जाऊन त्यांनी निवारा केंद्राची पाहणी केली. येथील सर्व बचावलेल्या लोकांची कंटेनर्समध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना लवकरच पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आजचा स्वातंत्र्यदिन त्यांनी इर्शाळवाडीतही साजरा केला.


इर्शाळवाडी दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या ४२ कुटुंबांची मुख्यमंत्र्यांनी यावेळेस भेट घेतली. या कुटुंबांशी, येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना व्यवस्थित खायला मिळतंय का, राहण्यात काही अडचणी येत नाहीत ना, या सगळ्याची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून या कालावधीत सरकारने सर्वांच्या बचावासाठी प्रगतीपथावर काम केलं आहे.



इर्शाळवाडीचं पुनर्वसन करण्यासाठी इर्शाळगडाच्या बाजूलाच असलेली पाच एकरची जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यांत सिडकोच्या माध्यमातून त्या ४२ कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या तरुण व शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला, तरुण यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची  व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह