Ajit Pawar : राज्य सरकारची 'ही' योजना जगाच्या इतिहासात कुठेही नाही

कमी पावसामुळे राज्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता


कोल्हापूर : माझा शेतकरी, कष्टकरी वाचला पाहिजे म्हणून सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. कांदा उत्पादकांसाठी सरकारनं साडेपाचशे कोटी मंजूर केले आहेत. शिवाय, शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरु केली आहे. जगाच्या इतिहासात अशी योजना कोणीही सुरु केली नव्हती, ती योजना आपण आपल्या राज्यात सुरु केली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.


भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बरा असला तरी, पिकांना जेवढा पाऊस हवा होता, तेवढा मिळाला नाही. आज देखील आपल्या राज्यातील काही भागात टॅंकर सुरु करावे लागताहेत. ऑगस्टअखेरपर्यंत आणि सप्टेंबरमध्ये राज्यात पाऊस व्हायला हवा, अन्यथा भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. मात्र राज्य सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे आणि योग्य उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच