मी मुंबईत येतोय, हिम्मत असेल तर हल्लाबोल करून दाखवा; 'या नेत्याने' दिले थेट मनसेला आव्हान

मुंबई : पाकिस्तानी महिला सीमा हैदर सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनच्या प्रेमात पडली. तिने भारतात येऊन सचिनसोबत संसारही थाटला. सीमा-सचिनच्या या प्रेमकथेवर आधारीत चित्रपट काढण्याचा संकल्प केल्यानंतर या चित्रपटावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसेने या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट बनवणारे अमित जानी यांना धमकी देण्यात आली होती. या धमकीला आज अमित जानी यांनीही उत्तर दिले आहे. मी मुंबईत येतोय, हिंमत असेल तर हल्ला करुन दाखवा, असे अमित जानी यांनी म्हटले आहे.


मेरठचे रहिवासी आणि उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी (Uttar Pradesh Navnirman Sena President Amit Jani) हे या दोघांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. 'कराची टू नोएडा' नावाच्या या चित्रपटासाठी लीड फेसही फायनल झाला आहे, सुप्रसिद्ध मॉडेल फरहीन फालक या चित्रपटात सीमाची भूमिका साकारणार आहे, सचिनची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, त्या आधीच हा चित्रपट वादात सापडला आहे.


दरम्यान, मनसेचे चित्रपट विभागाचे नेते अमेय खोपकर म्हणाले होते की, 'पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतेही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती आयएसआय एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!'


त्यावर अमित जानी यांनीही 'मी थांबणार नाही, मी १९ ऑगस्टला मुंबईत येणार आहे. मनसेची हिम्मत असेल तर हल्लाबोल करून दाखवा,' असे अमित जानी यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन