मी मुंबईत येतोय, हिम्मत असेल तर हल्लाबोल करून दाखवा; 'या नेत्याने' दिले थेट मनसेला आव्हान

मुंबई : पाकिस्तानी महिला सीमा हैदर सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनच्या प्रेमात पडली. तिने भारतात येऊन सचिनसोबत संसारही थाटला. सीमा-सचिनच्या या प्रेमकथेवर आधारीत चित्रपट काढण्याचा संकल्प केल्यानंतर या चित्रपटावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसेने या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट बनवणारे अमित जानी यांना धमकी देण्यात आली होती. या धमकीला आज अमित जानी यांनीही उत्तर दिले आहे. मी मुंबईत येतोय, हिंमत असेल तर हल्ला करुन दाखवा, असे अमित जानी यांनी म्हटले आहे.


मेरठचे रहिवासी आणि उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी (Uttar Pradesh Navnirman Sena President Amit Jani) हे या दोघांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. 'कराची टू नोएडा' नावाच्या या चित्रपटासाठी लीड फेसही फायनल झाला आहे, सुप्रसिद्ध मॉडेल फरहीन फालक या चित्रपटात सीमाची भूमिका साकारणार आहे, सचिनची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, त्या आधीच हा चित्रपट वादात सापडला आहे.


दरम्यान, मनसेचे चित्रपट विभागाचे नेते अमेय खोपकर म्हणाले होते की, 'पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतेही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती आयएसआय एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!'


त्यावर अमित जानी यांनीही 'मी थांबणार नाही, मी १९ ऑगस्टला मुंबईत येणार आहे. मनसेची हिम्मत असेल तर हल्लाबोल करून दाखवा,' असे अमित जानी यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.