Delhi Services Bill : दिल्ली सेवा विधेयकाचे कायद्यात रूपांतर; विरोधकांच्या आघाडीचा मोठा पराभव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली मान्यता...


नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांचा कडाडून विरोध असलेल्या दिल्ली सेवा विधेयकाला (Delhi Services Bill) अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या विधेयकाचे आज कायद्यात (Law) रुपांतर झाले. मणिपूरमधील परिस्थितीवर लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेत (Rajyasabha) गदारोळ होत असताना हे विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. राष्ट्रीय राजधानीच्या अधिकार्‍यांचे निलंबन आणि चौकशी यासारख्या कृती केंद्राच्या नियंत्रणाखाली असतील असे या विधेयकात प्रस्तावित आहे.


यासोबतच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या चार विधेयकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली. यात डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक (Digital Personal Data Protection Bill), जन्म आणि मृत्यूची नोंदणी (दुरुस्ती) विधेयक (Registration of Births and Deaths Bill), राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार (दुरुस्ती) विधेयक [Government of National Capital Territory of Delhi (Amendment) Bill] आणि जन विश्वास (तरतुदींची दुरुस्ती) विधेयक [Jan Vishwas (Amendment of Provisions) Bill] यांचा समावेश आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १ ऑगस्ट रोजी गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक, २०२३ लोकसभेत मांडले. त्यानंतर हे विधेयक ७ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय राजधानीतील नोकर्‍यांबाबत केंद्र सरकारला अधिकार प्रदान करणार्‍या या विधेयकाला राज्यसभेत त्याच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते मिळाली होती.



कसे मंजूर झाले विधेयक?


सर्वोच्च न्यायालयाने ११ मे ला अधिकाऱ्यांच्या पोस्टींगचे, बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारचे असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर मोदी सरकारने अध्यादेश जारी करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पालटवला. केंद्र सरकारला या अध्यादेशाला ६ महिन्याच्या आत संसदेची मान्यता घ्यावी लागते. म्हणून केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले होते. या अधिवेशनात बहुतांश विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. मात्र विरोधकांच्या प्रचंड गोंधळानंतर शेवटी सत्ताधार्‍यांच्या बाजूने जास्त मतं पडल्याने ते लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले. आज अखेर राष्ट्रपतींचीही संमती मिळाल्याने विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.



विरोधकांच्या आघाडीचा हा मोठा पराभव


संसदेत हे विधेयक मंजूर होणे हा काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह २६ विरोधी पक्षांच्या नव्याने बांधलेल्या आघाडीचा पहिला पराभव आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे (NDA) बहुमत नसलेल्या राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्याची विरोधकांना आशा होती परंतु वायएससीआरपी (YSCRP) आणि बिजू जनता दल (BJD) सारखे पक्ष सत्ताधारी आघाडीच्या बचावासाठी आले आणि हे विधेयक मंजूर झाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ