Rahul Shewale : ठाकरे गटाच्या 'त्या' पाच खासदारांवर कारवाई होणार

पंतप्रधानांच्या भाषणावर बहिष्कार टाकण्याचे प्रकरण भोवणार


मुंबई : लोकसभेतील पंतप्रधानांच्या भाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या शिवसेनेच्या (ShivSena) पाच खासदारांवर कारवाई होणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दिली.


विरोधी पक्षांकडून लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्याला पंतप्प्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाद्वारे उत्तर दिले. या अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र यावेळी ठाकरे गटाचे ५ खासदार अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.


शेवाळे यांनी खुलासा केला की, ‘पक्षाने केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला होता. मात्र, त्यावेळी पाच खासदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.’ याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली जाईल आणि सोमवारी संबंधित खासदारांना औपचारिक नोटिस पाठवल्या जातील, असेही शेवाळे यांनी सांगितले.


त्यांनी सांगितले की, पक्ष लोकसभेत एकसंध अस्तित्व म्हणून काम करत आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी प्रसारित केलेला व्हीप शिवसेना पक्षाच्या सदस्यांनी मानने गरजेचे आहे. गुरुवारी अविश्वास ठरावावर मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी देखील वॉक आउट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.


दरम्यान, शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत माध्यमांनी वृत्तही दिले होते. याबाबत शेवाळे यांना विचारले असता त्यांनी, अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे यावर चर्चा होण्याचा प्रश्न नाही, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराला सुवर्णवैभव! अधिक मासात भाविकाकडून १.५ किलो सोन्याचा कळस दान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला (Kolhapur Ambabai Temple) नव्या सुवर्णवैभवाची भर पडली आहे.

Mumbai-Goa Highway : प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-गोवा महामार्गावर मोठा दिलासा! संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील ३ महत्त्वाचे पूल लवकरच सुरू

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून