Rahul Gandhi: खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा वायनाडच्या दौऱ्यावर

  123

मुंबई: काँग्रेस नेता राहुल गांधी शनिवारी १२ ऑगस्टला दोन दिवसांच्या आपल्या खासदार क्षेत्र वायनाडच्या दौऱ्यावर जात आहेत. नुकतेच त्यांना संसदेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा वायनाडचा हा पहिलाच दौरा आहे. राहुल गांधीच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसची केरळ युनिट उत्साहात आहे.


मोदी आडनावावरुन झालेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर स्थगिती दिल्यानंतर सोमवारी ७ ऑगस्टला राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. यानंतर ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. तेथे त्यांनी मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला होता तसेच मणिपूर प्रकरणावरून सरकारला घेरले होते.


राहुल गांधींना मोदी आडनावावरून झालेल्या प्रकरणात सीजेएम कोर्टाने या वर्षी २३ मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. चार महिन्यानंतर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेवर स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.



केरळ काँग्रेसची भव्य तयारी


वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीने राहुल गांधींच्या स्वागतासाठी भव्य तयारी केली आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कलपेट्टा येथील बस स्टँड परिसरात त्यांच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी १२ वाजता नल्लूरनाडूमधील आंबेडकर मेमोरियल कॅन्सर सेंटरमध्ये एका टाय टेन्शन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करतील.



खासदारकी गेल्यानंतर गेले होते वायनाडला


याआधी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर १० एप्रिलला ते वायनाड दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान त्यांनी संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

Comments
Add Comment

मागून येत होते धुराचे लोट, आगीच्या लोळामधून एकटे बाहेर पडले विश्वास कुमार, पाहा VIDEO

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी १२ जूनला एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे एक विमान जे लंडनला

plane crash: कोणत्या देशात होतात सर्वाधिक विमान अपघात, आकडा पाहून व्हाल हैराण

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्यांनाच हादरवून टाकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व

Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

जबलपूर: मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका बाळंतीणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या

उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

अमरोहा : उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ५ महिलांचा मृत्यू झाला

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आदी १६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

गलवानची ५ वर्षे : संघर्ष, संधी आणि संयमाचा प्रवास

गलवान खोऱ्यातील पाच वर्षे : भारत-चीन सीमा संघर्ष ते शांतता १५ जून २०२०... जी तारीख भारत-चीनदरम्यान झालेल्या भीषण