Rahul Gandhi: खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा वायनाडच्या दौऱ्यावर

मुंबई: काँग्रेस नेता राहुल गांधी शनिवारी १२ ऑगस्टला दोन दिवसांच्या आपल्या खासदार क्षेत्र वायनाडच्या दौऱ्यावर जात आहेत. नुकतेच त्यांना संसदेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा वायनाडचा हा पहिलाच दौरा आहे. राहुल गांधीच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसची केरळ युनिट उत्साहात आहे.


मोदी आडनावावरुन झालेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर स्थगिती दिल्यानंतर सोमवारी ७ ऑगस्टला राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. यानंतर ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. तेथे त्यांनी मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला होता तसेच मणिपूर प्रकरणावरून सरकारला घेरले होते.


राहुल गांधींना मोदी आडनावावरून झालेल्या प्रकरणात सीजेएम कोर्टाने या वर्षी २३ मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. चार महिन्यानंतर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेवर स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.



केरळ काँग्रेसची भव्य तयारी


वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीने राहुल गांधींच्या स्वागतासाठी भव्य तयारी केली आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कलपेट्टा येथील बस स्टँड परिसरात त्यांच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी १२ वाजता नल्लूरनाडूमधील आंबेडकर मेमोरियल कॅन्सर सेंटरमध्ये एका टाय टेन्शन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करतील.



खासदारकी गेल्यानंतर गेले होते वायनाडला


याआधी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर १० एप्रिलला ते वायनाड दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान त्यांनी संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

Comments
Add Comment

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि

Gold Vs Venom : सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग, जाणून घ्या

मुंबई: जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार,

Trending: दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा

मुंबई: आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे २०२३ बॅचच्या दोन तरुण

Air Ambulance Crash : झारखंडमध्ये एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात: ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

रांची: झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एका खासगी चार्टर एअर अँब्युलन्सला भीषण

लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची भीती; ISI च बांगलादेशी कनेक्शन उघड

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळ लाल किल्ला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याची