Rahul Gandhi: खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा वायनाडच्या दौऱ्यावर

मुंबई: काँग्रेस नेता राहुल गांधी शनिवारी १२ ऑगस्टला दोन दिवसांच्या आपल्या खासदार क्षेत्र वायनाडच्या दौऱ्यावर जात आहेत. नुकतेच त्यांना संसदेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा वायनाडचा हा पहिलाच दौरा आहे. राहुल गांधीच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसची केरळ युनिट उत्साहात आहे.


मोदी आडनावावरुन झालेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर स्थगिती दिल्यानंतर सोमवारी ७ ऑगस्टला राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. यानंतर ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. तेथे त्यांनी मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला होता तसेच मणिपूर प्रकरणावरून सरकारला घेरले होते.


राहुल गांधींना मोदी आडनावावरून झालेल्या प्रकरणात सीजेएम कोर्टाने या वर्षी २३ मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. चार महिन्यानंतर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेवर स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.



केरळ काँग्रेसची भव्य तयारी


वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीने राहुल गांधींच्या स्वागतासाठी भव्य तयारी केली आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कलपेट्टा येथील बस स्टँड परिसरात त्यांच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी १२ वाजता नल्लूरनाडूमधील आंबेडकर मेमोरियल कॅन्सर सेंटरमध्ये एका टाय टेन्शन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करतील.



खासदारकी गेल्यानंतर गेले होते वायनाडला


याआधी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर १० एप्रिलला ते वायनाड दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान त्यांनी संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

Comments
Add Comment

मुलीला अंक लिहिता आले नाही म्हणून पित्याकडून बेदम मारहाण!

चार वर्षांच्या मुलीचा दु:खद अंत हरियाणा : हल्ली पालकांकडूनच मुलांवर शिक्षणाच्या बाबतीत अतिरिक्त ताण टाकला जातो.

इंडिगोचे ७१७ फेऱ्या रद्द

इतर एअरलाईनला संधी नवी दिल्ली : डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या उड्डाण गोंधळानंतर नागरी विमान वाहतूक

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात

माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमता विशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व

एका महिन्यात ९०० कुत्र्यांची हत्या

तेलंगणा : तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील पेगाडपल्ली गावात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. या

५ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

थंडी आणखी वाढणार नवी दिल्ली : देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढताना दिसत असून कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक

भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार !

पहिले घटक २०२८ मध्ये अंतरिक्षात नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) देशासाठी अत्यंत