गणपतीला कोकणात जाताय? तर ही बातमी वाचाच

मुंबई: गणेशोत्सव म्हटला की कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होते. त्यातच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने खुशखबर आणली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी गणपती स्पेश गाड्यांच्या अधिक फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामुळे आता मोठ्या प्रमाणात चाकरमनी आपल्या कोकणातील आपल्या गावाला जाऊ शकतील.


याआधी पश्चिम रेल्वेने चाकरमान्यांसाठी गणपती स्पेशल ट्रेन्स जाहीर केल्या होत्या. त्यात रेल्वेने अधिक फेऱ्या वाढवल्याचे ठरवल्याने चाकरमान्यांची गावाला जाण्याची चिंता मिटली आहे. ज्यांना याआधीच्या रेल्वेचे तिकीट मिळाले नाही त्यांच्यासाठी ही बातमी खरंच आनंदाची आहे. यात उधना येथून मडगाव आणि मंगळुरूला जाणाऱ्या रेल्वे तसेच अहमदाबाद-कुडाळ या मार्गांवर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.



या आहेत विशेष फेऱ्या


रेल्वेच्या या विशेष फेऱ्यांसाठी तिकीट काढण्याची मुभा १२ ऑगस्टपासून असेल. या नव्या घोषणेंतर्गत उधना-मडगाव स्पेशल रेल्वे उधना या ठिकाणाहून शनिवारी आणि बुधवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी मडगावला पोहोचेल.


तसेच अहमदाबाद-कुडाळ स्पेशतसेच ल ही गाडी अहदमबाद येथून दर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी कुडाळ येथे पोहोचेल. ही गाडी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीदरम्यान धावणार आहे. तसेच डाऊन मार्गावरील कुडाळ-अहमदाबाद स्पेशल ट्रेन कुडाळवरून दर बुधवारी सकाळी सहा वाजून ३० मिनिटांनी सुटेल तर ती दुसऱ्या दिवशी ३ वाजून ३० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. ही रेल्वे १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहील. या प्रवासादरम्यान ही रेल्वे वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.


तर उधना-मंगळुरू ही स्पेशल ट्रेन उधना येथून दर बुधवारी २० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.३०ला पोहोचेल. ही गाडी १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहील. तर मंगळुरू-उधना ही रेल्वे मंगळुरू येथून दर गुरूवारी २०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.००वाजता पोहोचले. ही गाडी १४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे.

Comments
Add Comment

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक