Say No to Plastic : कापडी पिशव्या वापरा... नाहीतर 'या' कठीण कारवाईला सामोरे जा

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी शासनाची कठोर पावले


मुंबई : पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकार (State Government) जागृत झाले असून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. त्यातच मुंबईत पावसामुळे तुंबण्याचे प्रकार वाढल्याने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गटारांमध्ये, नदीनाल्यांमध्ये तुंबणारे हे पाणी प्लास्टिकच्या कचर्‍यामुळे (Plastic Waste) होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांना ५००० रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्या दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवरही कारवाई केली जाईल. १५ ऑगस्टनंतर प्लास्टिकचा वापर आढळल्यास ही कारवाई केली जाणार आहे.


याआधीही अनेकदा प्लास्टिक न वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली आहे. मात्र तितकी कठोर पावले उचलली गेली नाहीत. यावेळेस मात्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍यांना रोखण्यासाठी पालिकेचे तीन अधिकारी, एक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे.



कोणत्या प्लास्टिक गोष्टींवर असणार बंदी?


प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) , फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, कँडी स्टिक, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड ,सिगरेटचं पॅकेट, १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी), अशा प्लास्टिक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.



का घेण्यात आला हा निर्णय?


प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. प्लास्टिक कचरा नाले, गटारांमध्ये अडकून राहिल्याने पूर परिस्थती निर्माण होते. त्यामुळे प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय आहे. यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. कचरा डेपो, समुद्रामध्ये हा कचरा फेकला जातो. याची पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :

Vinayak Raut News : विनायक राऊतांची सून घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राऊत कुटुंबियांचा पाय खोलात; फिरोज बाबा शेखच्या साथीदारालाही अटक मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत(Vinayak

Pratap Sarnaik : एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

"झाडे लावा, झाडे जगवा; पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी" – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :

MHADA Lottery 2026 : आनंदवार्ता! आता घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडाची ५ हजार घरांची मेगा लॉटरी लवकरच

- ठाणे-पनवेलसह 'या' शहरांचा समावेश मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठी

BMC News : महापालिका मालमत्तांच्या कागदी नोंदी, कोट्यवधी रुपयांचा बुडताे महसूल

- मालमत्तांसाठी केंद्रीकृत डिजिटल नोंदणी, जीआएस आधारीत प्रणाली करा विकसित - भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी

DCM Eknath Shinde : ठाण्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तत्काळ हटवून स्ट्रक्चरल ऑडिट करा

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; होर्डिंग दुर्घटनेची घेतली गंभीर दखल मुंबई : ठाण्यात सोमवारी घडलेल्या