Dhule News : आदिवासी दिनानिमित्त लावलेला फलक फाडल्याप्रकरणी धुळ्यात दोन गटांत राडा

आमदार काशीराम पावरांसह पोलिसांच्या सहा गाड्यांची तोडफोड


१८ जण जखमी, तर २०० दंगलखोरांवर गुन्हा दाखल


धुळे : शिरपूर तालुक्यातील चारणपाडा येथे आदिवासी दिनानिमित्त (World Tribal Day) लावलेला फलक फाडल्याच्या कारणावरून दंगल झाली. या दंगलीत १५ पोलिसांसह तीन गावकरी जखमी झाले आहेत. शिवाय दगडफेकीत शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीसह पोलीस प्रशासनाच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने दंगल आणि जीवे ठार करण्याच्या प्रयत्नाच्या कलमांसह सुमारे २०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर गावातून पोलीस प्रशासनाने रूट मार्च करून जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


चारणपाडा भागातील दंगल रोखण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरा बळाचा वापर करीत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे मध्यरात्री नंतर ही दंगल आटोक्यात आली. दरम्यान सकाळ पासून या भागात राज्य राखीव दलाची एक तुकडी तर दंगल प्रतिबंधक करणाऱ्या दोन तुकड्या यांच्यासह मुख्यालयातील राखीव पोलिसांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.


पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, यांच्यासह अनेक अधिकारी रात्रीपासूनच या भागात तळ ठोकून आहे. तर सकाळपासून या तणावपूर्ण परिसरात पोलिसांनी रूट मार्च करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान दंगलखोराची ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली असून अटक सत्र सुरू झाले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जनतेला शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.



नेमके प्रकरण काय?


शिरपूर तालुक्यातील सांगवी नजीक असलेल्या चारणपाडा येथे आदिवासी दिनानिमित्त फलक लावण्यात आले होते. या फलकाचे नुकसान झाल्याची बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी काही तरुण संशयितांकडे गेले. मात्र यावेळी संवाद होण्याऐवजी हाणामारी झाली. त्यामुळे एक गट फलक फाडणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यासाठी बसला. त्यामुळे महामार्गावरील रहदारी ठप्प झाली.


दरम्यान वातावरणातील गंभीरता ओळखून सांगवी आणि शिरपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच शिरपूरचे आमदार काशीराम पावरा हे देखील जमावाची समजूत घालण्यासाठी आले. मात्र जमावांमधून घोषणाबाजी आणखी वाढली. यावेळी पोलिसांची अधिकची कुमक देखील घटनास्थळी पोहोचली. यानंतर जमाव हिंसक झाला. जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तर काही तरुणांनी आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी रस्त्यावर उलटवली. तर पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर देखील दगडफेक करण्यास सुरुवात झाली.


या दगडफेकीत पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी आमदार पावरा यांना सुरक्षेसाठी तातडीने एका घरात हलवले. यानंतर मात्र जमावाने दगडफेक आणखीनच वाढवली. परिस्थिती हिंसक झाल्यामुळे जिल्ह्याभरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. या दंगलीची माहिती कळाल्याने जिल्हाभरातील पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना टार्गेट केले गेले. दगडफेकीसाठी जमावाकडून गोफनचा देखील वापर केल्या गेल्याचा संशय व्यक्त होतो आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नाशिक : विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने ३५ कोटींची वर्कआॅर्डर, कुंभमेळा कामांत मोठा घोटाळा समोर

नाशिक - नाशिक व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यानिमित्त विविध विकासकामे वेगात सुरू असताना, चक्क

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला थेट...

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन

US And Iran War : पाकिस्तानने अमेरिकेच्या नाकेबंदी दरम्यान इराणसाठी सहा भूमार्ग केले खुले

वॉशिंग्टन : पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावत

लक्ष द्या ! 1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये होणार 'हे' मोठे बदल , आताच जाणून घ्या

LPG Cylinder Booking Rule : घरांपासून ते मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र एलपीजीचा वापर केला जातो. मध्य पूर्वेतील

Mumbai-Pune Expressway Missing Link : महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ वाहतुकीसाठी खुली

- पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी; प्रवास होणार अधिक जलद व सुरक्षित मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण