Ganesh Idols: गणेशमूर्ती उंचीच्या मर्यादेची अट हमीपत्रातून वगळली

पीओपी गणेशमूर्तींनाही परवानगी; पालिकेचा दिलासा


मुंबई : गणेश मूर्तींच्या उंचीच्या मर्यादेची अट हमीपत्रातून वगळण्यात आली असून यंदाच्या वर्षी पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पीओपीची गणेश मूर्ती साकारणाऱ्या मुर्तिकारांना पालिकेचा दिलासा मिळाला आहे.


१९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. मुंबईत १२ हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तर १ लाख ९० हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा हमीपत्रात गणेश मूर्तीच्या उंचीवर ४ फूटाच्या मर्यादेमुळे गणेशोत्सव मंडळासमोर अडचण निर्माण झाली होती. मात्र मुंबई महापालिकेने हमीपत्रातून अट वगळली आहे. तसेच पीओपीच्या गणेशमूर्तीची अट देखील शिथिल केल्याचे मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले.


श्री गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२३ पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधे अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा > मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर १ ऑगस्टपासून १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :

EL Nino effects to Kharif : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे सावट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता मुंबई : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य

Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा

कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियामध्ये करार

राज्यातील युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील गरिब नगर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ जणांना