जम्मू-काश्मीरसह उत्तराखंडमध्ये हाहाकार! अमरनाथ यात्रा थांबवली

भूस्खलनामुळे हॉटेल कोसळले, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, केदारनाथमध्ये भूस्खलनाने २ लहान मुलांचा मृत्यू


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसह उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.


जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा थांबवावी लागली. लोकांना राष्ट्रीय महामार्ग-४४ वर प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


उत्तराखंडमध्ये रामपूरमध्ये डोंगरावरून दगड पडल्याने हॉटेल कोसळले. रुद्रप्रयागच्या उत्तरकाशीमध्ये रस्त्याचा काही भाग कोसळला.


पौरी गढवाल जिल्ह्यातील थाना कोटद्वार अंतर्गत मालन पुलाजवळ १५ जण नदीत अडकले होते. ज्यांना एसडीआरएफच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. हल्दवणीमध्ये ३ तास मुसळधार पाऊस झाला.


काठगोदामच्या कलसियामध्ये अडकलेल्या १५० जणांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. गौळा नदीत मुसळधार पाणी आले असून, त्यानंतर बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.


याच कलशिया नाल्यात घरांचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत दोन घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.



केदारनाथमध्ये भूस्खलनाने २ लहान मुलांचा मृत्यू


केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये जमीन खचल्याची घटना घडली असून तीन लहान मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील दोन लहान मुलांचा मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली.

Comments
Add Comment

Local body Elections : भाजपची ऐतिहासिक मुसंडी; मतदानाआधीच तब्बल ७५ टक्के जागा बिनविरोध!

'गेम' झाल्याचा काँग्रेसचा आरोप, काँग्रेसने घेतली थेट हायकोर्टात धाव! मुंबई : संपूर्ण देशात स्थानिक स्वराज्य

Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर आपटले; ब्राझिलियन मॉडेल काय म्हणाली, पहा..

मतदार यादीतील फोटोमुळे 'स्वीटी' अर्थात लारिसा थेट चर्चेत नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा

"तुमची स्कीन खूप ग्लो करते!" हरलीन देओलचा पंतप्रधान मोदींना मिश्किल सवाल, मोदींनी दिलं खास उत्तर...

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच इतिहास रचत, पहिल्यांदाच महिला विश्वचषकावर आपले नाव कोरले. या

राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही

बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या

क्यूएस क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यंदा