The Elephant Whisperers : ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्परर्स'च्या आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर आरोप

निर्मात्यांनी मात्र आरोप फेटाळून लावले... काय आहे प्रकरण?


नवी दिल्ली : द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) या ऑस्कर विजेत्या माहितीपटाचा (Oscar winning documentary) भाग असलेल्या बोमन आणि बेली (Boman and Belly) या आदिवासी जोडप्याने (Tribal Couple) या माहितीपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस (Kartiki Gonsalves) आणि सिख्या एंटरटेनमेंटवर (Sikhya Entertainment) गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, या जोडप्याने असा आरोप केला आहे की डॉक्युमेंटरीच्या निर्मात्यांनी त्यांना मोबदला दिला नाही आणि या वर्षाच्या सुरुवातीला ऐतिहासिक ऑस्कर जिंकल्यानंतर त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देखील दिला नाही.


आदिवासी जोडप्याने असाही आरोप केला की शूटिंगदरम्यान कार्तिकी खूप मैत्रीपूर्ण होती, परंतु चित्रपटाला गोल्डन ट्रॉफी मिळाल्यानंतर सर्वकाही बदलले आणि तेव्हापासून कार्तिकी त्यांच्या संपर्कात नाही. आमच्या चेहऱ्यांमुळे तिला हा पुरस्कार मिळाला, मात्र आम्हाला नंतर ऑस्कर ट्रॉफीला हातही लावू दिला नव्हता, असा दावाही त्यांनी केला आहे.


"कार्तिकी म्हणाली की तिला लग्नाचा सीन एका दिवसात शूट करायचा आहे. मात्र, तिच्याकडे त्यासाठी पैसे नव्हते आणि आम्हाला ती व्यवस्था करायला सांगितली. त्यासाठी आमचा सुमारे एक लाख रुपये खर्च आला. कार्तिकीने आम्हाला आश्वासन दिले होते की ती परत येईल. परंतु ते पैसे तिने आजपर्यंत परत केले नाहीत. जेव्हा आम्ही तिला कॉल करतो तेव्हा ती म्हणते की ती व्यग्र आहे आणि ती लवकरच आमचे पैसे परत करेल. पण ती कधीच करत नाही," असा या दोघांनी आरोप केला.


या डॉक्युमेंटरीनंतर आम्ही आमची शांतता गमावली. आम्ही मुंबईहून कोईम्बतूरला परत आल्यावर आमच्याकडे आमच्या घरी जाण्यासाठी देखील पैसे नव्हते. आम्ही तिच्याकडे प्रवासासाठी पैसे मागितले होते, तरी देखील ती आम्हाला पैसे देऊ शकली नाही, तसेच ती पुढे म्हणाली की, तिच्याकडे पैसे नाहीत आणि लवकरच ती पैशाची व्यवस्था करणार आहे.



प्रोडक्शन हाऊसने जारी केले निवेदन... काय म्हटले आहे?


प्रोडक्शन हाऊस सिख्या एंटरटेनमेंट आणि चित्रपटाची दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांनी या आरोपांना उत्तर दिले आहे. जारी केलेल्या निवेदनात निर्मात्यांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध केलेले सर्व दावे खोटे आहेत. मात्र, त्यांनी थेट आरोपांकडे लक्ष दिलेले नाही.


निवेदनात असे लिहिले आहे की, ''द एलिफंट व्हिस्परर्स तयार करण्याचे उद्दिष्ट नेहमीच हत्तींचे संवर्धन, वन विभाग आणि त्याचे महावत्स बोमन आणि बेली यांचे प्रचंड प्रयत्न अधोरेखित करणे हे राहिले आहे. लाँच झाल्यापासून, माहितीपटाने कारणाविषयी जागरुकता वाढवली आहे आणि त्याचा माहूत आणि कावडी समुदायावर प्रत्यक्ष प्रभाव पडला आहे. तामिळनाडूचे आमचे माननीय मुख्यमंत्री, एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या हत्तींची देखभाल करणाऱ्या ९१ माहूत आणि कावड्यांना मदत करण्यासाठी, काळजीवाहूंसाठी पर्यावरणपूरक घरे बांधण्यासाठी आणि अनामलाई व्याघ्र प्रकल्पात हत्ती शिबिर विकसित करण्यासाठी देणग्या दिल्या आहेत.''


निवेदनात असेही म्हटले आहे की, "डॉक्युमेंटरी संपूर्ण भारतातील राज्यप्रमुखांनी साजरी केली आहे, आणि ऑस्कर पुरस्कार हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण आहे ज्याने बोमन आणि बेली सारख्या माहुतांच्या कार्याला व्यापक मान्यता दिली आहे. केलेले सर्व दावे खोटे आहेत. आम्हाला या कथेतील सर्व योगदानकर्त्यांबद्दल मनापासून आदर आहे आणि आम्ही सकारात्मक बदल घडवण्याच्या इच्छेने प्रेरित आहोत."



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम