‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाचा ४०००वा प्रयोग दिमाखात

Share

मुंबई (प्रतिनिधी) : कलारंजना मुंबई निर्मित, उदय साटम संकल्पित-दिग्दर्शित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाचा ४०००वा प्रयोग व कलारंजना संस्थेचा ३२ वा वर्धापनदिन दामोदर हॉल परेल येथे रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्कार पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांसह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. आजी माजी ७०हून अधिक कलाकारांच्या संचात पार पडलेल्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी कलारंजना संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर व कार्यक्रमातील आजी-माजी कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सिनेअभिनेते सुशांत शेलार, पार्श्वगायक नंदेश उमप आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ऑर्केस्ट्रामधून पुढे आलेला कलाकार आहे हे सांगताना अभिमान वाटतोय. माझ्यासारख्या अनेक कलाकारांना या कार्यक्रमाने घडवले आहे. त्यामुळे जितके आभार मानावे तितके थोडेच, अशी प्रतिक्रिया अभिनेते सुशांत शेलार यांनी व्यक्त केली.
पार्श्वगायक नंदेश उमप म्हणाले की, निर्माता होणे ही बाब सोपी नाही, कारण निर्मात्यांच्या अडचणी काय असतात हे मी देखील अनुभवतोय. कलाकारांच्या अनेक पिढ्या घडवण्याचे काम उदय साटम यांच्या कलारंजना या संस्थेने केले आहे. या रंगमंचाने आम्हा सर्वांनाच भरभरून दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

7 minutes ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

19 minutes ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

22 minutes ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

23 minutes ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

30 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

41 minutes ago