Pravin Darekar : भगवा तुम्हाला सांभाळता आला नाही यात दोष कोणाचा?

प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला


मुंबई : उबाठा गटाच्या वतीने काल संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) आयोजित केलेल्या एका मेळाव्यात उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते तसेच देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली. या टीकेला भाजपचे नेते चोख प्रत्युत्तर देत आहेत. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. तर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.


प्रवीण दरेकर म्हणाले की, आज उद्धव ठाकरेंना संभाजी ब्रिगेडचा आसरा घ्यावा लागतो आहे, कारण आपल्या सभांना शिवसैनिक येतील का हा प्रश्न त्यांना पडला असेल. ठाकरेंनी कायम मराठा नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मग नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकांना त्यांनी बाजूला केले.


कालच्या उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यांना उत्तर देतांना दरेकर म्हणाले की, भगवा तुम्हाला सांभाळता आला नाही यात दोष कोणाचा? आम्ही देशविरोधींची थडगी उद्ध्वस्त केली आणि तुम्ही याकूब मेमनच्या थडग्याचं उद्दतीकरण करत बसलात. त्यामुळे आपल्याला हिंदुत्वाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आपली हिंदुत्वाची व्याख्या काँग्रेसला मान्य आहे का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला.


पुढे ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंचा उल्लेख आशिष शेलार यांनी घरबशा केला. मात्र तो आता बदलून घरकोंबडा करावा लागेल कारण ते घरातून आरवतात'. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मस्टर मंत्री म्हटल्यामुळे दरेकर म्हणाले, 'ते देवेंद्रजींवर टीका करतात कारण त्यांनी ठाकरेंच्या नाकाखालून सरकार नेलं. त्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली टीका हा बालिशपणा आहे', असा दरेकरांनी हल्ला चढवला.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच