BEST Bus Strike : बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या सहाव्या दिवशीही संपामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई : रेल्वे नंतर मुंबईकरांची पसंती असलेली वाहतूक सेवा म्हणजे बेस्ट बसच्या (BEST Bus) कंत्राटी कामगारांचा सलग सहाव्या दिवशी आणि आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील संप (BEST Bus Strike) कायम आहे.


अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नसल्याने बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यामुळे मुंबईतील बेस्टची बस सेवा विस्कळीत झाली आहे.


बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकारकडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.


दरम्यान मालाड येथे कंत्राटी कामगारांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तेथे बेस्ट कडून मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायमस्वरूपी चालक व वाहक भाडेतत्त्वावरील बसेस चालवत असल्याने कंत्राटी कामगार त्यांना रोखून धमकावत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल

मुंबई : हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार

मुंबई : युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत

'पल्स' मुळे आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार

मुंबई : सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे

द्राक्ष पिकाच्या संरक्षणासाठी तासगाव व नाशिक येथे विशेष केंद्रांच्या मागणीचा सकारात्मक

मुंबई : राज्यातील द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या कराराच्या माध्यमातून राज्य शासनाने यासंदर्भात

बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू

पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना ४५ वर्षांनंतर मिळणार न्याय

मुंबई : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांना