BEST Bus Strike : बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या सहाव्या दिवशीही संपामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई : रेल्वे नंतर मुंबईकरांची पसंती असलेली वाहतूक सेवा म्हणजे बेस्ट बसच्या (BEST Bus) कंत्राटी कामगारांचा सलग सहाव्या दिवशी आणि आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील संप (BEST Bus Strike) कायम आहे.


अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नसल्याने बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यामुळे मुंबईतील बेस्टची बस सेवा विस्कळीत झाली आहे.


बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकारकडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.


दरम्यान मालाड येथे कंत्राटी कामगारांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तेथे बेस्ट कडून मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायमस्वरूपी चालक व वाहक भाडेतत्त्वावरील बसेस चालवत असल्याने कंत्राटी कामगार त्यांना रोखून धमकावत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण