इंफाळ (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबलेला नसून गेल्या २४ तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागातील हिंसक घटनांमध्ये पिता-पुत्रासह एकूण सहा जणांची हत्या झाली आहे. बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात सकाळपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात १६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला पाचारण करण्यात आले असून लष्करी जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. बंदुकीची गोळी लागून जखमी झालेल्या एका बंडखोराला लष्कराने ताब्यात घेतले आहे.
सुरक्षा दलातील सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, या भागात झालेल्या हत्यांपैकी दोन जणांना खूप जवळून गोळ्या घातल्या आहेत. तसेच त्यांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी रविवारी इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये संचारबंदीमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचं सांगितं जात आहे.
बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमेवर शनिवारी (५ ऑगस्ट) अनेक ठिकाणी मोर्टार आणि ग्रेनेड हल्ले झाले.
तसेच दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. गेल्या दोन आठवड्यांपैकी कालच्या दिवशी इम्फाळसह बिष्णुपूर-चुराचांदपूरमधली परिस्थिती खून नाजूक होती.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…