Threat call to Mumbai Police : दहशतवाद्यांचा मुंबईवर डोळा? पुन्हा एकदा धमकीचा फोन...

नेमकं काय झालं या फोन कॉलवर?


मुंबई : मुंबईवर दहशतवाद्यांचा (Terrorists in Mumbai) पुन्हा एकदा डोळा असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पुन्हा एकदा धमकीचा फोन (Threat call) आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला असून फोनवर बोलताना संबंधित व्यक्तीनं मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. काही वेळानं फोन करणाऱ्यानं त्याचा मोबाईल बंद केला होता. या फोनमुळे मुंबई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिली.


आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले.


महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलीस यामुळे अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

मुंबई :  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा

Maharashtra Weather Alert : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट..

उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण.. मुंबई  :

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

मुंबईच्या डब्बेवाल्यांची पाच दिवसांची सुट्टी, मुंबईकरांना करावी लागणार डब्याची सोय

मुंबई : मुंबई लाईफलाईन म्हटली की दोन गोष्टी नजरेसमोर येतात एक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे मुंबईचे