नवी दिल्ली : तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून तेथील सर्वसामान्य नागरिकांचे जिवन कष्टमय झाले आहे. तालिबान सरकार दररोज नवनवीन प्रतिगामी निर्णय घेत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा अश्मयुगात जातोय की काय अशी शंका येऊ लागली आहे. तालिबानने एक नवा फतवा काढला असून मुलींना तिसऱ्या वर्गाच्या पुढे शिकण्यावर बंदी आणली आहे.
तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांना याबाबत इशारा दिला आहे. याआधी तालिबानमधील मुलींना सहावीच्या वर्गापर्यंत शिकण्याची परवानगी होती, पण त्यात आणखी घट करण्यात आली आहे. बीबीसीने यासंदर्भातील रिपोर्ट देताना म्हटले आहे की, तालिबान सरकारमधील शिक्षणाधिकाऱ्यांनी गजनी प्रांतातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना इशारा दिला आहे. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तिसरीपर्यंतच मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी असेल. तालिबान सरकारच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानातील महिला सामाजिक कार्यक्षेत्रातून हद्दपार होण्याची शक्यता आहेत.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…