Rocky Aur Rani Ki Premkahani : ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ची जोरदार चर्चा


  • ऐकलंत का! : दीपक परब


आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. रणवीर - आलियाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनकरिता रणवीर-आलिया आणि करण जोहर हे मुंबईतील एका थिएटरमध्ये गेले. अचानक तिथे जाऊन त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले. आता या तिघांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये आलिया आणि रणवीर स्वत: आल्याचे प्रेक्षकांना समजताच सर्वजण आपापल्या जागेवरून उठताना दिसत आहेत. लोकांनी त्या दोघांसोबत फोटो काढले. तसेच या दरम्यान आलियाने प्रेक्षकांना प्रश्न विचारला की, कसा आहे चित्रपट? त्यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रणवीर-आलियाने हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. रणवीर सिंह आणि आलिया भट्टा यांचा हा चित्रपट काही नेटकऱ्यांना आवडला असून त्यांनी दोघांच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे.


करण जोहरने सात वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचे कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे.


हा चित्रपट परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व असलेल्या जोडप्यावर आधारित आहे, जे प्रेमात पडतात आणि लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,