Rocky Aur Rani Ki Premkahani : ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ची जोरदार चर्चा

  113


  • ऐकलंत का! : दीपक परब


आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. रणवीर - आलियाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनकरिता रणवीर-आलिया आणि करण जोहर हे मुंबईतील एका थिएटरमध्ये गेले. अचानक तिथे जाऊन त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले. आता या तिघांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये आलिया आणि रणवीर स्वत: आल्याचे प्रेक्षकांना समजताच सर्वजण आपापल्या जागेवरून उठताना दिसत आहेत. लोकांनी त्या दोघांसोबत फोटो काढले. तसेच या दरम्यान आलियाने प्रेक्षकांना प्रश्न विचारला की, कसा आहे चित्रपट? त्यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रणवीर-आलियाने हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. रणवीर सिंह आणि आलिया भट्टा यांचा हा चित्रपट काही नेटकऱ्यांना आवडला असून त्यांनी दोघांच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे.


करण जोहरने सात वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शनात पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचे कथानक इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे.


हा चित्रपट परस्परविरोधी व्यक्तिमत्त्व असलेल्या जोडप्यावर आधारित आहे, जे प्रेमात पडतात आणि लग्न करण्यापूर्वी तीन महिने एकमेकांच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतात. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले