नकारात्मक राजकारणात विरोधक मश्गुल

Share

मोदींचा विरोधकांवर प्रहार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘देशातील विरोधक हे नकारात्मक राजकारण करण्यात मश्गुल आहेत’, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, ‘आमचे सरकार हे सकारात्मक राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहे. यांच्या (विरोधकांच्या) असल्या क्षुल्लक राजकारणापेक्षा आम्ही विकासाला प्राधान्य देतो’. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रविवारी देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केल्यानंतर एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी आरोप केला की, विरोधी पक्ष हे काम करणार नाही आणि इतरांना काम करू देणार नाही, या तत्त्वावर भर देत आहेत’.
रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ या योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठविली. मोदी म्हणाले, गेल्या ७० वर्षात यांनी एकही युद्धस्मारक बांधलेले नाही. आमच्या सरकारने जेव्हा ते बांधले तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला. विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असतात. संसद भवनाच्या नवीन इमारतीलाही त्यांनी विरोधी केला होता. हे लोक कधी स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे फिरकले नाहीत. सरदार पटेल यांच्यापुढे ते कधी नतमस्तक झाले नाहीत. हे लोक स्वतः काही करणार नाहीत आणि दुसऱ्याला करू देणार नाहीत. ना काम करणार ना, करू देणार, ही त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची वृत्ती आहे आणि ते आजही त्याच वृत्तीला चिकटून बसले आहेत. त्यांनी कधी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे जाऊन आदरांजली वाहिलेली नाही. संसदेची आधुनिक इमारत बांधण्यात आली आहे, पण विरोधकांमधील काही महाभागांनी त्याला विरोधही केला. देशाचा विकास हा देशातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी त्यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ घोषणेचाही उल्लेख केला. भारतीय रेल्वेचे कौतुक करत मोदी म्हणाले, आपल्या रेल्वेने अलिकडच्या काही वर्षांमध्ये १५ लाखांहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

यांनी एकही युद्धस्मारक बांधले नाही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आम्ही कर्तव्य मार्गाचा विकास केला, परंतु यांनी त्यालाही विरोध केला. यांनी ७० वर्षात देशातील वीरांसाठी किंवा शहिदांसाठी एकही युद्धस्मारक बांधलेले नाही. परंतु, आम्ही युद्धस्मारक बांधले तेव्हा यांनी त्यावर टीका केली. युद्धस्मारकावर टीका करताना यांना लाज कशी नाही वाटली?’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

18 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

37 minutes ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

1 hour ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

1 hour ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

2 hours ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

3 hours ago