Narayan Rane : नारायण राणे यांनी नुसते वळून बघितले तरी अर्ध्या सेकंदात विरोधी पक्षाचे सर्व आमदार खाली बसत...

  171

जयंत पाटील यांनी विधानसभेत काढले प्रशंसोद्गार


मुंबई : ‘विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नारायण राणे साहेब जेव्हा होते, त्यावेळी त्यांचा सभागृहात वेगळाच प्रभाव आणि दरारा होता. त्यांनी नुसते डावीकडे वळून बघितले तरीही अर्ध्या सेकंदात विरोधी पक्षातले सगळे आमदार खाली बसत होते. राणेसाहेबांचा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असायचा. त्यांची भाषणे सुद्धा अभ्यासपूर्ण असायची,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.


काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेता कसा असावा, हे सांगताना नारायण राणे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. जयंत पाटील म्हणाले, राणे साहेब विरोधी पक्षनेता असताना मी राज्याचा अर्थमंत्री होतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाकांवरील सदस्यांवर राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव होता. प्रत्येक विषयावर त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे मंत्री म्हणून आम्हालाही त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नीट अभ्यास करून यावा लागत होता. या सभागृहात बसून त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे केली आहेत.


अर्थसंकल्प सादर झाल्यांनतर त्यांची प्रतिक्रिया असायची, जयंत पाटील यांनी काय अर्थसंकल्प मांडला व तो सगळा कसा चुकीचा आहे, असे ते सांगत होते. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट असायची. जोरात बोलण्याची त्यांची वेगळीच ढब होती. राणे यांच्याप्रमाणेच एकनाथ खडसे देखील जोरात बोलणारे विरोधी पक्षनेते होते, अशी आठवण जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितली.



नारायण राणेसाहेबांचा कोट... 


जयंत पाटील म्हणाले की, ‘विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा संबंध नेहमी सौहार्दपूर्ण असायला पाहिजे. याचे उदाहरण त्यांनी सांगितले. ‘मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो, क्रिकेटची मॅच ४ वाजता होती, अरुण गुजराथी सभापती होते, त्यांना विनंती केली की, मला उद्या अर्थसंकल्प लवकर म्हणजे एक किंवा दोन वाजता मांडण्याची परवानगी द्यावी, कारण ४ वाजता मॅच सुरू झाली तर अर्थसंकल्प कोणी बघणार नाही. ते म्हणाले की विरोधी पक्षनेत्यांशी बोलले पाहिजे. तेव्हा राणेसाहेबांना फोन केला. ते म्हणाले जयंत तू म्हणशील ती वेळ, पण कपडे काय घालणार ते सांग. मी म्हणालो, कपडे काय, शर्ट आणि पँट. ते म्हणाले नाही, नाही, महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटाबुटातच आला पाहिजे. आदल्या दिवशी मी माझ्या दालनात आलो, तिथे टेलर हजर. मी म्हटलं अंगाला हात लावायचा नाही, मी काही माप देणार नाही. तो म्हणाला आम्हाला साहेबांनी सांगितलेय. बळजबरीने माप घेऊन, दुसऱ्या दिवशी मी नारायण राणेसाहेबांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सोंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था

Kolhapuri Chappal Controversy : प्राडाच्या फॅशन रॅम्पवर कोल्हापुरी चप्पलचा रुबाब! तर, इटालियन 'प्राडा'वर चोरीचा आरोप... काय आहे नेमकं प्रकरण?

'भारताला श्रेय नाही'... नेटिझन्स पेटले मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या एका फॅशन शोची जबरदस्त चर्चा

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान