रुद्रप्रयाग : राज्यात पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी उत्तर भारतात (North India) मात्र पावसाचे थैमान (Heavy rainfall) सुरुच आहे. पूरसदृश परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यातच गौरीकुंडमध्ये (Gaurikund) सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तराखंड (Uttarakhand) येथील रुद्रप्रयाग (Rudraprayag) जिल्ह्यात पुन्हा एकदा भूस्खलनाची (landslide) घटना घडली आहे. दरड कोसळल्याने सुमारे १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. रुद्रप्रयाग पोलिस, एसडीआरएफ (SDRF), डीडीआरएफसह (DDRF)अनेक पथके बचावकार्यात गुंतली आहेत, मात्र टेकडीवरून सतत दगड कोसळत असल्याने बचाव पथकाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
गुरुवार संध्याकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावर दरड कोसळून दोन दुकानांचे नुकसान झाले. दुकानात काम करणारे सुमारे १३ लोक ढिगाऱ्याखाली दबले. भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ आणि डीडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. आणि बचावकार्य सुरू केले. मात्र बेपत्ता लोकांबद्दल अजून माहिती मिळू शकलेली नाही. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचीही सुटका होऊ शकली नाही. यातील काही लोक स्थानिक तर काही नेपाळमधील आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास डाक पुलियाजवळ भूस्खलन झाले. माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य थांबवावे लागले. आता सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाने एक यादी जारी केली असून त्यात १३ जणांची नावे आहेत. मात्र, हे लोक बेपत्ता आहेत की नदीत वाहून गेले आहेत की ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…
चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…
मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…
मुंबई: जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जुलै २०२४मध्ये ४ मोठे ग्रह शुक्र, बुध, मंगळ आणि…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…
मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…