Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन; १३ जण बेपत्ता

  170

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार


रुद्रप्रयाग : राज्यात पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी उत्तर भारतात (North India) मात्र पावसाचे थैमान (Heavy rainfall) सुरुच आहे. पूरसदृश परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यातच गौरीकुंडमध्ये (Gaurikund) सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तराखंड (Uttarakhand) येथील रुद्रप्रयाग (Rudraprayag) जिल्ह्यात पुन्हा एकदा भूस्खलनाची (landslide) घटना घडली आहे. दरड कोसळल्याने सुमारे १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. रुद्रप्रयाग पोलिस, एसडीआरएफ (SDRF), डीडीआरएफसह (DDRF)अनेक पथके बचावकार्यात गुंतली आहेत, मात्र टेकडीवरून सतत दगड कोसळत असल्याने बचाव पथकाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.


गुरुवार संध्याकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावर दरड कोसळून दोन दुकानांचे नुकसान झाले. दुकानात काम करणारे सुमारे १३ लोक ढिगाऱ्याखाली दबले. भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ आणि डीडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. आणि बचावकार्य सुरू केले. मात्र बेपत्ता लोकांबद्दल अजून माहिती मिळू शकलेली नाही. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचीही सुटका होऊ शकली नाही. यातील काही लोक स्थानिक तर काही नेपाळमधील आहेत.


आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास डाक पुलियाजवळ भूस्खलन झाले. माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य थांबवावे लागले. आता सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाने एक यादी जारी केली असून त्यात १३ जणांची नावे आहेत. मात्र, हे लोक बेपत्ता आहेत की नदीत वाहून गेले आहेत की ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )