Wamanrao Pai : अनंत रूपे अनंत वेषे...


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


परमेश्वर हा विषय आपल्या जीवनात इतका महत्त्वाचा आहे की, हा परमेश्वर क्षणोक्षणी, पावलो पावली आपल्यासोबत असतो. किंबहुना त्याच्याशिवाय आपल्याला एक क्षणही जगात येणार नाही, एक पाऊल टाकता येणार नाही इतके त्याचे महत्त्व आहे म्हणून परमेश्वराबद्दल जेवढे आपण जाणून घेऊ व जेवढे समजून घेऊ तितके आपले जीवन, आपला प्रपंच सुखकर ठरेल यासाठी मी हा विषय विस्ताराने घेतो आहे.


मी आधीच सांगितले आहे की, परमेश्वर हा निर्गुण होता तो सगुण झाला. निर्गुण परमेश्वर जो एक होता तो अनंत रूपे अनंत वेषे सगुण झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “अनंत रूपे अनंत वेषे देखिले म्या त्यासी.” अनंत हा शब्द अगदी अचूक आहे. अनंत म्हणजे त्याची आपल्याला गणती करताच येणार नाही. पशू , पक्षी, माणसे, चर व अचर ही सगळी जी निर्मिती झालेली आहे ती पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्याची निर्मिती ही अनंत आहे. आपल्याला त्याची कल्पनाही करता येणार नाही इतकी ती दिव्य व अनंत आहे. विश्वांत जगांत परमेश्वर हा अनंत रूपाने, अनंत वेषाने प्रगट झालेला आहे. जो प्रकट झाला तो, ज्याच्यात प्रगट झाला त्याच्यात वास करून राहिलेला आहे म्हणून त्याला वासुदेव म्हणतात.


सांगायचा मुद्दा तो सर्व ठिकाणी आहे, तो आपल्या ठिकाणी आहे, तो कुठे नाही असे होत नाही. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. एरव्ही संसारात सुद्धा आपण काही लोकांसाठी बरेच. पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आता जीवनविद्येतसुद्धा किती लोक येतात व जातात कारण, जीवनविद्येने लोकांना काय दिलेले आहे, किती मौल्यवान ज्ञान दिलेले आहे याची लोकांना किंमत नाही. ज्यांना सद्गुरूंबद्दल जाणीव नाही, सद्गुरूंबद्दल कृतज्ञता नाही असे लोक आले व गेले कारण जाणीवच नाही. स्वरूपाची जाणीवच नाही कारण ते तर अव्यक्त आहे. पण सद्गुरू काय करतात हे दिसते, त्यांनी दिलेले ज्ञान दिसते तरी जाणीव नाही. स्वरूपाच्या ठिकाणी जरा वेगळे आहे. या ठिकाणी आपण आपल्याला विसरलेले आहोत. हे विसरणे अद्भुत आहे. हे साधे विसरणे नाही. २९ चा पाढा पूर्वी पाठ होता, आता म्हणायला सांगितला, तर म्हणता येईल की नाही? पूर्वी आठव होता आता ते विसरलो.


एक काळ असा होता की, आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव होती पण आता ती राहिलेली नाही.“तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती.” It is a thing of past. आता दोन ज्योती झाल्या. जीवज्योत व आत्मज्योत. वास्तविक मुळात ती एकच आहे, कल्पनेने दोन झाली. राजा भ्रमिष्ट झाला व भीक मागू लागला. भिकारी व राजा हे दोन दिसतात का? राजा तोच भिकारी व भिकारी तोच राजा. तसे इथे झालेले आहे. आज आपण आपले दिव्यत्व हरवून बसलेले आहोत त्यालाच माया म्हणतात. हे असे विषय समजून घेण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते आणि असे ज्ञान मिळवायला आवश्यकता असते ती सद्गुरू मार्गदर्शनाची.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन