बोरिवलीतील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आढळला ज्येष्ठ महिलेचा कुजलेला मृतदेह

मुंबई : बोरिवली येथील राजेंद्र नगरमधील एकता भूमी या उच्चभ्रू इमारतीत ७८ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. त्या घरात आजारी पती सोबत राहत होत्या. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सुलोचना भास्कर शेट्टी असे मयत महिलेचे नाव आहे.


एकता भूमी या इमारतीच्या के विंग मधील पाचव्या मजल्यावरील सुलोचना यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सुलोचना यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला आणि त्यांचे पती आजारी स्थितीत आढळून आले.


सुलोचना यांना मुलगी असून तिला कळविल्याचे पोलिसांनी सांगितले. सुलोचना भास्कर यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या अंगावर काहीही खूना नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. फ्लॅटमध्येही काही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस अधिक तपास करत आहेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली