Aurangzeb status : असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता?

औरंगजेबाच्या स्टेटसवरुन विधानसभेत गदारोळ.... नितेश राणे झाले आक्रमक


मुंबई : आपल्या राज्यामध्ये असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाहीत पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा 'सर तन से जुदा' आणि 'औरंग्या माझा बाप आहे', अशा घोषणा देणारे हे लोक आहेत. हे राज्याचं वातावरण खराब करतात. या लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही. असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता? असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane)विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. यावेळेस अब्बु आझमी (Abbu Azmi) आणि रईस शेख (Rais Shaikh) यांना उददेशून नितेश राणे गद्दार म्हणाले.


पुढे नितेश राणे म्हणाले, तुम्ही आमच्या मतांवर निवडून येता आणि इथे येऊन धिंगाणा घालता? यावेळेस नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एस. आय. टी. स्थापन करण्याची विनंती केली. शिवाय ते म्हणाले की आपल्याच विभागाचे काही लोक, काही सडके आंबे अशा प्रकारच्या लोकांना मदत करतात. या लोकांच्या विरोधातही चौकशी होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितेश राणे यांच्या प्रश्नाचे समाधान केले. एस. आय. टी. स्थापन केली जाईल तसेच औरंगजेब स्टेटस प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली जाईल असं ते म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासाकरता दंगे होणं, एखादा सामाजिक तणाव असणं हे योग्य नाही. आपण एक प्रागतिक राज्य आहोत त्यामुळे आपल्या प्रगतीवरही याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे एस. आय. टी. द्वारे योग्य चौकशी केली दोईल. त्याचप्रमाणे एखादा मिटण्याची शक्यता असतानाही तो मिटवण्यात पोलिसांकडून दिरंगाई झाली असेल तर त्यावरही योग्य चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा