Aurangzeb status : असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता?

औरंगजेबाच्या स्टेटसवरुन विधानसभेत गदारोळ.... नितेश राणे झाले आक्रमक


मुंबई : आपल्या राज्यामध्ये असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाहीत पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा 'सर तन से जुदा' आणि 'औरंग्या माझा बाप आहे', अशा घोषणा देणारे हे लोक आहेत. हे राज्याचं वातावरण खराब करतात. या लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही. असंच असेल तर पाकिस्तानात निघून जा, इथे का राहता? असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane)विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. यावेळेस अब्बु आझमी (Abbu Azmi) आणि रईस शेख (Rais Shaikh) यांना उददेशून नितेश राणे गद्दार म्हणाले.


पुढे नितेश राणे म्हणाले, तुम्ही आमच्या मतांवर निवडून येता आणि इथे येऊन धिंगाणा घालता? यावेळेस नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एस. आय. टी. स्थापन करण्याची विनंती केली. शिवाय ते म्हणाले की आपल्याच विभागाचे काही लोक, काही सडके आंबे अशा प्रकारच्या लोकांना मदत करतात. या लोकांच्या विरोधातही चौकशी होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितेश राणे यांच्या प्रश्नाचे समाधान केले. एस. आय. टी. स्थापन केली जाईल तसेच औरंगजेब स्टेटस प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली जाईल असं ते म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासाकरता दंगे होणं, एखादा सामाजिक तणाव असणं हे योग्य नाही. आपण एक प्रागतिक राज्य आहोत त्यामुळे आपल्या प्रगतीवरही याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे एस. आय. टी. द्वारे योग्य चौकशी केली दोईल. त्याचप्रमाणे एखादा मिटण्याची शक्यता असतानाही तो मिटवण्यात पोलिसांकडून दिरंगाई झाली असेल तर त्यावरही योग्य चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची