Kalyan news : दोन दिवस भर पावसात भिजत उभी होती महिला... एका रिक्षाचालकाच्या तत्परतेने तिचे प्राण वाचले!

एक फेसबुक पोस्ट आणि.... वाचा नेमकं काय घडलं?


कल्याण : एकीकडे राज्यात महिला सुरक्षेच्या प्रश्नाचे गांभीर्य वाढत चालले आहे तर दुसरीकडे एका रिक्षाचालकाने आपल्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. रिक्षाचालक आणि जागरुक सामाजिक कार्यकर्ते म्हणून कल्याण परिसरात प्रसिद्ध असलेल्या मनोज वाघमारे या रिक्षाचालकाच्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या तत्परतेला जिजाऊ संस्थेची अमूल्य मदत मिळाली.


गुरुवारी २७ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान रिक्षाचालक वाघमारे यांनी फेसबुकला एक पोस्ट पहिली. त्या पोस्टमध्ये एक अनोळखी महिला दोन दिवसांपासून भर पावसात कल्याण येथील शितलादेवी मंदिराजवळ असलेल्या शेलार हॉस्पिटलच्या परिसरात भिजत असल्याचे सांगण्यात आले होते. तिचे काही विडीओ देखील पोस्ट करण्यात आले होते. ही पोस्ट पाहिल्यावर रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी जिजाऊ संस्थेच्या परिवारातील सदस्य असलेल्या रुपेश पाटील यांना याबाबत कळवले व स्वतः देखील तेथे जाऊन भर पावसात भिजत उपचारासाठी तळमळणाऱ्या त्या महिलेला रुपेश यांसह स्वत:च्या रिक्षात बसवून कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल पश्चिम येथे उपचारासाठी दाखल केले.


यावेळी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सदर महिलेची माहिती देऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना बोलावले असता त्या पोलीस स्थानकातून बराच कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वाघमारे यांनी ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले व खबर घेण्यात आली.


जिजाऊ संस्थेने तत्परतेने दखल घेतल्याने ही महिला वाचली आहे. जिजाऊ संस्थेसारख्या चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या सोबत प्रशासनाने आणि प्रत्येक नागरिकाने सहकार्याच्या भावनेने उभे राहिले पाहिजे असे वाघमारे यावेळी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा