Kalyan news : दोन दिवस भर पावसात भिजत उभी होती महिला... एका रिक्षाचालकाच्या तत्परतेने तिचे प्राण वाचले!

एक फेसबुक पोस्ट आणि.... वाचा नेमकं काय घडलं?


कल्याण : एकीकडे राज्यात महिला सुरक्षेच्या प्रश्नाचे गांभीर्य वाढत चालले आहे तर दुसरीकडे एका रिक्षाचालकाने आपल्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. रिक्षाचालक आणि जागरुक सामाजिक कार्यकर्ते म्हणून कल्याण परिसरात प्रसिद्ध असलेल्या मनोज वाघमारे या रिक्षाचालकाच्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या तत्परतेला जिजाऊ संस्थेची अमूल्य मदत मिळाली.


गुरुवारी २७ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान रिक्षाचालक वाघमारे यांनी फेसबुकला एक पोस्ट पहिली. त्या पोस्टमध्ये एक अनोळखी महिला दोन दिवसांपासून भर पावसात कल्याण येथील शितलादेवी मंदिराजवळ असलेल्या शेलार हॉस्पिटलच्या परिसरात भिजत असल्याचे सांगण्यात आले होते. तिचे काही विडीओ देखील पोस्ट करण्यात आले होते. ही पोस्ट पाहिल्यावर रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी जिजाऊ संस्थेच्या परिवारातील सदस्य असलेल्या रुपेश पाटील यांना याबाबत कळवले व स्वतः देखील तेथे जाऊन भर पावसात भिजत उपचारासाठी तळमळणाऱ्या त्या महिलेला रुपेश यांसह स्वत:च्या रिक्षात बसवून कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल पश्चिम येथे उपचारासाठी दाखल केले.


यावेळी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सदर महिलेची माहिती देऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना बोलावले असता त्या पोलीस स्थानकातून बराच कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वाघमारे यांनी ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले व खबर घेण्यात आली.


जिजाऊ संस्थेने तत्परतेने दखल घेतल्याने ही महिला वाचली आहे. जिजाऊ संस्थेसारख्या चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या सोबत प्रशासनाने आणि प्रत्येक नागरिकाने सहकार्याच्या भावनेने उभे राहिले पाहिजे असे वाघमारे यावेळी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह