Kalyan news : दोन दिवस भर पावसात भिजत उभी होती महिला... एका रिक्षाचालकाच्या तत्परतेने तिचे प्राण वाचले!

  231

एक फेसबुक पोस्ट आणि.... वाचा नेमकं काय घडलं?


कल्याण : एकीकडे राज्यात महिला सुरक्षेच्या प्रश्नाचे गांभीर्य वाढत चालले आहे तर दुसरीकडे एका रिक्षाचालकाने आपल्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. रिक्षाचालक आणि जागरुक सामाजिक कार्यकर्ते म्हणून कल्याण परिसरात प्रसिद्ध असलेल्या मनोज वाघमारे या रिक्षाचालकाच्या तत्परतेने एका महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या तत्परतेला जिजाऊ संस्थेची अमूल्य मदत मिळाली.


गुरुवारी २७ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान रिक्षाचालक वाघमारे यांनी फेसबुकला एक पोस्ट पहिली. त्या पोस्टमध्ये एक अनोळखी महिला दोन दिवसांपासून भर पावसात कल्याण येथील शितलादेवी मंदिराजवळ असलेल्या शेलार हॉस्पिटलच्या परिसरात भिजत असल्याचे सांगण्यात आले होते. तिचे काही विडीओ देखील पोस्ट करण्यात आले होते. ही पोस्ट पाहिल्यावर रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी जिजाऊ संस्थेच्या परिवारातील सदस्य असलेल्या रुपेश पाटील यांना याबाबत कळवले व स्वतः देखील तेथे जाऊन भर पावसात भिजत उपचारासाठी तळमळणाऱ्या त्या महिलेला रुपेश यांसह स्वत:च्या रिक्षात बसवून कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल पश्चिम येथे उपचारासाठी दाखल केले.


यावेळी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सदर महिलेची माहिती देऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना बोलावले असता त्या पोलीस स्थानकातून बराच कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वाघमारे यांनी ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले व खबर घेण्यात आली.


जिजाऊ संस्थेने तत्परतेने दखल घेतल्याने ही महिला वाचली आहे. जिजाऊ संस्थेसारख्या चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या सोबत प्रशासनाने आणि प्रत्येक नागरिकाने सहकार्याच्या भावनेने उभे राहिले पाहिजे असे वाघमारे यावेळी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून