Kapil Dev: पैसे आल्यावर अहंकारदेखील येतो! वाचा कपिल देव यांनी कुणाला सुनावले?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंची चांगलीच कानउघडणी केली आहे. आत्मविश्वास असणं ही जमेची बाजू असली तरी आपल्याला सगळं येतं. आपण सर्वज्ञ आहोत, असं वाटू लागणं योग्य नाही. तुम्ही आत्मविश्वासू असता हे ठीक आहे. पण तुम्हाला कोणाला काहीच विचारायची गरज वाटत नाही. अनुभवी खेळाडूंकडून सल्ला घ्यावासा वाटत नाही, हे कही बरं नव्हे, अशा शब्दांत कपिल देव यांनी भारतीय संघातील खेळाडूंना सुनावलं.


ते पुढे म्हणाले, पैसे आल्यावर अहंकारदेखील येतो. काही खेळाडू असेही आहेत की त्यांच्यातला अहंकार त्यांचा सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूकडून सल्ला घेण्याच्या आड येतो. सुनिल गावसकर तिथे आहेत. तुम्ही त्यांच्याशी का बोलत नाहीत?, असा प्रश्न देव यांनी उपस्थित केला.


भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी काही दिवसांपूर्वीच सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंवर भाष्य केलं होतं. भारतीय क्रिकेटपटू क्वचितच आपल्याकडून सल्ला घेण्यास येतात, असं गावसकर म्हणाले होते. 'राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हिव्हीएस लक्ष्मण माझ्याकडे नेहमी यायचे. त्यांच्या काही समस्या घेऊन ते यायचे. माझी काही निरीक्षणं त्याबद्दल असायची. त्याबद्दल मी त्यांच्याशी मोकळेपणानं बोलायचो,' असं गावसकरांनी म्हटलं होतं.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण