Nigar Sultana vs Haramanpreet: बांगलादेशची महिला कर्णधार निगर सुलतानाचे हरमनप्रीतवर पुन्हा टीकास्र

भारत आणि बांगलादेश महिला एकदिवसीय मालिका संपली. तरी त्याचा वाद मात्र अजून संपलेला नाही. मीरपूरमधील तिस-या एकदिवसीय सामन्याच्या वेळी अंपायरिंगवरून बराच गदारोळ झाला. त्यानंतर भारतीय संघाला बांगलादेश दौरा संपवावा लागला. अंपायरने दिलेल्या एलबीडब्ल्यू आऊटवरून हा वाद रंगाला होता. त्याची शिक्षा देखील हरमनप्रीला(harmanpreet kaur) मिळाली. या शिक्षेवरून आता बांगलादेशची कर्णधार निगर सुलतानाने(Nigar Sultana) टीका केली आहे. मागील आठवड्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिला पंचांनी पायचित बाद केले. पंचांच्या निर्णयाने नाराज झालेल्या हरमनने स्टम्पवर आपला राग काढला. त्यानंतर सामना संपवल्यावरही तिने पंच, सामना अधिकाऱ्यांवर टीका केली होती.


आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हरमनप्रीत कौरला(harmanpreet kaur) पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निलंबित करण्यात आले आहे, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. या निलंबनामुळे हरमनप्रीत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. नाहिदा अख्तरच्या चेंडूवर हरमनप्रीतल पायचित बाद करण्यात आले. पण तो चेंडू तिच्या बॅटला लागला असल्याचा दावा तिने केला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी तिने आपला राग यष्टींवर काढला. त्यानंतर हरमनने बक्षीस वितरण समारंभात पंचांवर टीका केली. या मालिकेचे संयुक्त विजेते असलेल्या संघांसोबत पंचांनी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावे, असेही हरमनने म्हटले होते. असभ्य वर्तनामुळे बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने(Nigar Sultana) आपल्या संघासह ते ठिकाण सोडले आणि भारतीय कर्णधाराला शिष्टाचार शिकण्याचा सल्ला दिला.


मागेही एकदा तिने सामन्यानंतर हरमनप्रीतवर टीका केली होती. निगर म्हणाली, ही पूर्णपणे तिची समस्या आहे. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एक खेळाडू म्हणून ती अधिक चांगली वागणूक दाखवू शकली असती. हरमनप्रीतच्या त्या कृतीवर आयसीसीने घेतलेली अ‍ॅक्शन स्वागतार्ह आहे. मात्र, झालेली शिक्षा ही कमी की जास्त यावर फारशी बोलणार नाही. तिने त्यावेळी थोडा आदर दाखवणे आवश्यक होते. झालेली घटना निंदनीय स्वरुपाची आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

बडोद्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 'विराट' विजय

बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली.

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक

भारत विरुद्ध न्यूझीलंड ‘वन-डे’ची आजपासून रणधुमाळी

स्टार खेळाडूंचे पुनरागमन; जयस्वाल-पंत कट्ट्यावर? बडोदरा : भारतीय क्रिकेट संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी, रविवार (११

Cricket News: स्थानिक क्रिकेटपटुचा सामानादरम्यान मैदानातच मृत्यु; खेळता खेळता अचानक खाली पडला..

मिझोरममध्ये क्रिकेटसृष्टीत दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि वेंघनुई रेडर्स सीसीचे

तिलक वर्मा दुखापतग्रस्त

नवी दिल्ली : आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. युवा आणि प्रतिभावान