Samruddhi Highway : अपघातांनंतर समृद्धी महामार्ग आता डिझेलच्या चोरीमुळे चर्चेत

  176

एकाला बेड्या घालण्यात पोलिसांना यश


वाशिम : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातांच्या मालिकेनंतर आता उभ्या वाहनातून डिझेल चोरणार्‍या टोळीचे (Theft of diesel) प्रकरण चर्चेत आले आहे. या टोळ्या रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या ट्रक आणि कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टँकमधून पाईप आणि मोटरच्या साहाय्याने डिझेल चोरतात. आज सकाळी समृद्धी महामार्गावर कारंजा जवळ पुन्हा डिझेल चोरणाऱ्या एका आरोपीला गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी हे तीन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री वाशिमच्या (Washim) वनोजा जवळ पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना एका गाडीतून डिझेल चोरीला जात असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी या चोरांचा पाठलाग सुरु केला. या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.


अनेकदा या महामार्गावर चोरीच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यातच आता डिझेल चोरीच्या घटनांनी नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झाले असल्याचं म्हटलं जात आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन