Mumbai rain update: मुंबईत रेड अलर्टचा कालावधी वाढवला! हवामान विभागातर्फे नवीन नोटीस जारी

मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पाऊस जराही उसंत न घेता कोसळत असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पावसाचा वाढता जोर पाहून हवामान विभागाने रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट वाढवण्यात आला आहे.


येत्या तीन-चार तासांमध्ये हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. आझाद मैदान, काळबादेवी, भायखळा, दहिसर, बोरिवली, कांदिवली या भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक अत्यंत संथगतीने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी भरलेल्या भागांमधून वाहन नेऊ नका. तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.



मुंबईच्या लाईफलाईनची स्थिती काय?


मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन उपनगरीय रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा सुरळीत होती. परंतु, दुपानंतर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाल्याने रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक संथ झाली आहे. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट आणि मरिनलाईन्स स्थानकांत पाणी साचले आहे. बोरिवली स्थानकांतही ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने सुरु आहे. तर हार्बर रेल्वेच्या सेवेवरही काहीप्रमाणात परिणाम झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू