उद्धव ठाकरेंना शाळेत कोणी शिपायाची नोकरी तरी देणार आहे का?

भाजप आमदार नितेश राणे यांचा खोचक सवाल


मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या लायकीवर भाष्य करणार्‍या ठाकरे गटाच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज विधानभवलात पत्रकारांशी बोलताना खडे बोल सुनावले. यावेळेस, उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) लायकी कोणी काढू नये असं म्हणणार्‍या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांशिवाय लायकी काय? असा खडा सवाल विचारला. दरम्यान, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवरदेखील मिश्कीलपणे निशाणा साधला.


नितेश राणे म्हणाले, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रीही राहिलेले आहेत, त्यांची लायकी काढण्याचं काम आज स्वतः नागडा असलेल्या संजय राजाराम राऊतने केलेलं आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, उद्धव ठाकरेंची लायकी कोणी काढू नये आणि काढणार्‍या लोकांची पात्रता काय, असा याच्यासारख्या नालायक माणसाने उल्लेख केला. पण उद्धव ठाकरेंच्या नावातून बाळासाहेब ठाकरे जर काढून टाकलं तर उद्धव ठाकरेंना शाळेत कोणी प्युनची किंवा क्लर्कची नोकरी तरी देणार आहे का? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


पुढे नितेश राणे म्हणाले, सगळ्या गोष्टी बाळासाहेबांच्या नावाने खपवायच्या, त्यांच्यामुळेच उद्धव हे नाव महाराष्ट्राच्या समोर आहे. स्वतःचं कर्तृत्व मात्र शून्य आहे. मी संजय राऊतला विचारेन की तुझ्या मालकाची आणि तुझ्या मालकाच्या मुलाची बाळासाहेब ठाकरेंशिवाय नेमकी लायकी काय? याचं सर्टिफिकेट दे आणि मग दुसर्‍यांची लायकी काढायची हिंमत ठेव.



आधी याचिका मागे घ्या


मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणामुळे थांबली? कोर्टामध्ये केस कोणी टाकली? याची माहिती कायदा आणि कोर्टाबद्दल कळत असेल, तर उद्धव ठाकरे यांनी द्यावी. माझ्या माहितीनुसार कोर्टामध्ये हस्तक्षेप किंवा ज्या याचिका आहेत, त्यात सर्वाधिक याचिका ठाकरे गटाच्याच आहेत. त्यामुळे तुम्हाला जर निवडणूक पाहिजे असेल तर आधी याचिका मागे घ्या आणि मग मैदानात या, तुमचं वस्त्रहरण करुन तुम्हाला परत मातोश्रीमध्ये कायमस्वरुपी बसवलं, तर आम्ही जनतेसमोर जाणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.



आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा


पत्रकारांनी पावसात ठाकरे कुटुंबीय मदतीसाठी ग्राऊंडवर उतरत नाहीत याबद्दल विचारले असता, नितेश राणे मिश्कीलपणे म्हणाले, अशा घाणेरड्या पाण्यामध्ये, जिथे गटाराची दुर्गंधी आहे, तिथे पेंग्विनसारखे साधे प्राणी कसे फिरु शकतात? त्यांना स्वच्छ पाणी लागतं, त्यांना एसी लागतो. म्हणून उगाच कुठल्या बिचार्‍या एका लहान पेंग्विनचा जीव घ्यायला बघू नका, नाहीतर मला तुमची तक्रार करावी लागेल, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर  (Aditya Thackeray) निशाणा साधला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली