Good News : तुळशीपाठोपाठ तानसा, विहार तलावही 'ओव्हरफ्लो'

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी तानसा आणि विहार तलावही 'ओव्हरफ्लो' झाला आहे. विहार तलाव मध्यरात्री १२ वाजता (Vihar lake overflowing) तर तानसा तलाव बुधवारी पहाटे ४.३५ वाजता (Tansa lake overflowing) 'ओव्हरफ्लो' झाला. मुंबईला ५० टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात मात्र अपेक्षेपेक्षा कमी पाणी आहे.


मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत झालेल्या चांगल्या पावसामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. तानसा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर भिवंडी आणि ठाण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: या तलावांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.


मुंबईत चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या शेजारील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दहिसरमध्ये २४ तासांत १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

'एसआयआर' प्रक्रियेत एकाही पात्र मतदार वागळणार नाही

 मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम; बोगस मतदान रोखणे हाच मोहिमेचा हेतू मुंबई : मतदार याद्यांच्या

'Mumbai Tech Week 2026' : मुंबईत भरणार १० हजार 'डेव्हलपर्स' आणि तंत्रज्ञानप्रेमींचा मेळा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'Mumbai Tech Week 2026' : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भविष्यातील जागतिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून, महाराष्ट्र आता

पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि 'युएई'ला मागे टाकणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; १० वर्षांत अर्थव्यवस्थेचा आकार तिपटीहून अधिक वाढवला मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता

Maharashtra Weather Update : कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट, राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. राज्यात

BMC Makes 4-Way Waste Segregation : मुंबईत कचराकोंडीवर बीएमसीचा 'मास्टरस्ट्रोक': मोठ्या सोसायट्या, हॉटेल्ससाठी '४-स्तरीय' कचरा वर्गीकरण सक्तीचे!

मुंबई : मुंबई शहराला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या अक्राळविक्राळ समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा

Bandra : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये तोडक कारवाईदरम्यान राडा; पोलिसांवर पेव्हर ब्लॉक भिरकावणारा गजाआड

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 'गरीब नगर' (Garib Nagar) परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईदरम्यान एक अत्यंत