Good News : तुळशीपाठोपाठ तानसा, विहार तलावही ‘ओव्हरफ्लो’

Share

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी तानसा आणि विहार तलावही ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. विहार तलाव मध्यरात्री १२ वाजता (Vihar lake overflowing) तर तानसा तलाव बुधवारी पहाटे ४.३५ वाजता (Tansa lake overflowing) ‘ओव्हरफ्लो’ झाला. मुंबईला ५० टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात मात्र अपेक्षेपेक्षा कमी पाणी आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत झालेल्या चांगल्या पावसामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. तानसा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर भिवंडी आणि ठाण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: या तलावांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईत चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या शेजारील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दहिसरमध्ये २४ तासांत १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago