Good News : तुळशीपाठोपाठ तानसा, विहार तलावही 'ओव्हरफ्लो'

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी तानसा आणि विहार तलावही 'ओव्हरफ्लो' झाला आहे. विहार तलाव मध्यरात्री १२ वाजता (Vihar lake overflowing) तर तानसा तलाव बुधवारी पहाटे ४.३५ वाजता (Tansa lake overflowing) 'ओव्हरफ्लो' झाला. मुंबईला ५० टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात मात्र अपेक्षेपेक्षा कमी पाणी आहे.


मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत झालेल्या चांगल्या पावसामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. तानसा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर भिवंडी आणि ठाण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: या तलावांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.


मुंबईत चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या शेजारील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दहिसरमध्ये २४ तासांत १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Devendra Fadanvis : इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव मुंबई : ज्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश, बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू

Mumbai Metropolitan Region : मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम

महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

Eknath Shinde Opretion Tiger : 'उबाठा'च्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?

'ऑपरेशन टायगर'ला पुन्हा वेग; ९ पैकी ८ खासदार हजर असल्याची चर्चा मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा'

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच