Nashik : निफाड तालुक्यात युरियाचा काळाबाजार उघड

Share

लाखोंचा युरिया मुंबईला काळ्याबाजारात जाणारा ट्रक निफाड तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला

नाशिक : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निफाडला रात्री एक वाजेच्या सुमारास काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा युरियाचा ट्रक पकडून काळाबाजार करणारी टोळी उध्वस्त केली आहे.

लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवस फाटा नांदगाव रोडवर एका वस्तीवर केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उरवरक परी योजना शिक्का असलेल्या एका गोणीतून दुसऱ्या खाजगी गोणीत भरून एमएच १८ बीएच १७८६ या ट्रकने हा माल मुंबईकडे नेला जात होता.

काळ्याबाजार भावांप्रमाणे २० लाख रुपयांच्या ४०० ते ५०० युरियाच्या गोण्या भरून ही गाडी मुंबईत एका कंपनीत जात असताना निफाडला हा युरियाचा भरलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. एक संशयितासह ड्रायव्हर क्लीनर पोलिसांच्या ताब्यात आहेत. या गाडीत तब्बल ५०० गोण्या असल्याने मुद्देमालाची खातरजमा करून अजूनही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान गोडाऊन मधून फाडून रिकाम्या केलेल्या शासकीय गोण्याही एलसीबी पथकाने जप्त केल्या आहेत.

शेतकऱ्यांना स्वस्तात मुलबक युरिया मिळावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उरवरक परी योजना चालू केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी २८० रुपयांना मिळते. शेतकऱ्यांना युरिया मुबलक मिळत नाही व घ्यायचा असल्यास आधारकार्ड लिंक करून युरिया घ्यावा लागतो. तर कृषी परवानाधारक दुकानदार युरिया माफियाला गोणी २ हजार रुपयाला विकतात. तर युरिया माफिया ही गोणी मुंबईत कंपनीला ५००० हजार रुपयांना विक्री करतो, असे समजते.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

25 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

45 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago