मुंबई : मुंबईसह ठाणे, कल्याण, वसई-विरार, पालघर या भागांमध्ये मागील २४ तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईसह उपनगरात २०४ मिमी पाऊस बरसला असल्याची नोंद केली आहे. या वर्षातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तर मागील नऊ वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात २४ तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात अद्यापही पावसाची संततधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
या आधी मुंबईसह उपनगरांमध्ये दोन वेळा जुलै महिन्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्यांदा २ जुलै २०१९ रोजी ३७५.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर १६ जुलै २०२१ रोजी ४ तासांत २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणांतील पाणीसाठा ४२.७५ टक्क्यांवरुन ४७.५ टक्क्यांपर्यंत वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या ठाणे वेधशाळेने मुंबईसह पालघरला अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला हवामान विभागने यलो अलर्ट तर पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर वसईमध्ये सखल भागामध्ये पाणी साचले होते. तर जलसाठा कायम होता. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी देखील अडचण निर्माण झाली होती.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…