Mumbai - Pune Expressway : मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरू; आडोशी बोगद्याजवळ वाहनांच्या रांगा

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai - Pune Expressway) आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली होती. दगडमातीचा ढिगारा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला होता. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. आता तीनपैकी दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. एक लेन अजुनही बंद आहे.


एक लेन बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावरील लगदा रात्री अडीच वाजेपर्यंत हटवण्यात आला होता. त्यामुळे दोन लेन सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र वाहतूक धिम्म्या गतीने सुरू आहे. अजुनही आडोशी बोगद्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांची अडचण झाली आहे.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी