Maratha Kranti Morcha : पुन्हा निघणार मराठा क्रांती मोर्चा!

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha) सुरुवात ९ ऑगस्ट २०१६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथून झाली होती. आता त्याच छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत पुन्हा एकदा ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय न घेतल्यास सर्वच राजकीय पक्ष आरक्षणविरोधी असल्याची जनजागृती मराठा विद्यार्थी मोर्चा गावोगावी जाऊन करणार असल्याचेही यावेळी ठरविण्यात आले. याविषयीचा निर्णय मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीच्या बैठक घेण्यात आला आहे.



म्हाडा कॉलनी येथील जिजाऊ मंदिर येथे मराठा विद्यार्थी मोर्चातर्फे रविवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मराठा आरक्षण हे न्यायालयात अडकले नसून, राजकीय इच्छाशक्तीमुळे अडकले आहे. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मराठा समाज हा कुणबी म्हणून गणला जातो. मराठा व कुणबी एकच असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. गायकवाड आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध केले आहे. त्यामुळे आरक्षण देण्याची कृती ही राज्य शासनाचे असते. मात्र, शासनाने आतापर्यंत मराठा समाजाला गृहीत धरले आहे.


मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षणाचा प्रश्नच कायमस्वरुपी निकाली निघतो, अशी मांडणी विविध तज्ज्ञांनी आकडेवारीसह केली. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉ. राजेश करपे, सांख्यकिय तज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. विलास खंदारे, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. ललित अधाने, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गितांजली बोराडे, ॲड. आकाश गाढे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


९ ऑगस्टच्या क्रांती मोर्चात विद्यार्थी केंद्रस्थानी असणार आहेत. त्याचवेळी विद्यार्थ्यांचे पालक म्हणून समाजातील मान्यवर पाठीशी राहतील, असेही यावेळी ठरविण्यात आले. या बैठकीला ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, डॉ. राम चव्हाण, डॉ. भास्कर साठे, डॉ. कृतिका खंदारे यांच्यासह समाजातील प्राध्यापक, वकील, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली