Rain Updates : दिल्ली पुन्हा बुडणार!

  117

यमुना नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली


नवी दिल्ली : यमुना नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडल्याने दिल्लीत पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता यमुना नदीची पाणीपातळी २०६.५६ मीटरवर पोहोचली.


जुन्या रेल्वे पुलाजवळ यमुनेच्या पाण्याची पातळी १५ तासांत सुमारे एक मीटरने वाढली आहे. १३ जुलै रोजी यमुनेच्या पाण्याची पातळी विक्रमी उंचीवर (२०८.६६ मीटर) पोहोचली होती. त्यामुळे यमुनेच्या पुराचे पाणी लाल किल्ला, राजघाट आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.


दरम्यान, हरियाणात हथिनी कुंडातून पाणी सोडल्यानंतर पाण्याची पातळी वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एलजी व्ही के सक्सेना यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीला सामोरे जाण्याच्या तयारीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.


शाह म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम गरजू लोकांच्या मदतीसाठी उपस्थित आहेत. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या